शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना संकट तरीही मंत्रिमंडळ नाही, एकटे मुख्यमंत्री करतायेत कारभार; काँग्रेसचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 12:23 IST

मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते.

नवी दिल्ली – मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसनेभाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असताना एक महिन्यानंतरही मंत्रिमडळ स्थापन करण्यात आलं नाही. लोकांच्या आरोग्यापेक्षा सत्तेला प्राधान्य दिल्याचा आरोप काँग्रेसनेभाजपावर केला आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विट करुन म्हटलं आहे की, भाजपानं सत्तेला प्राधान्य दिल्याने हजारो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. मध्य प्रदेशात जवळपास एक महिन्यानंतरही मंत्रिमंडळ स्थापन केलं नाही. आरोग्य संकट असताना भाजपाने विलंब का केला? लोकांच्या आरोग्यापेक्षा भाजपाने सत्तेला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते. सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकमेव शिवराज चौहान मुख्यमंत्री म्हणून आहेत. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य मंत्र्यांची गरज होती. जो आरोग्य खातं सांभाळून कोरोनाविरुद्ध सख्त निर्णय घेऊ शकतं. मध्य प्रदेशात १ हजार ३१० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे भयंकर आहेत असा आरोप काँग्रेसने भाजपावर केला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी भाजपाकडे मास्टर प्लॅन आहे का? आतापर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही, अनेक आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. तसेच ज्या आमदारांनी काँग्रेसला फसवलं त्यांना टार्गेट करत म्हटलं आहे की, आमच्याशी धोका विसरुन जाऊ पण मध्य प्रदेशातील जनता हे विसरणार नाही. कोरोनाला जबाबदार भाजपा सरकार अशाप्रकारे त्यांनी ट्विटरवर हॅशटॅग वापरला आहे.

मध्य प्रदेशात गेल्या महिन्यात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०६ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सभागृहात बहुमत सिद्ध केलं.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश