शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Coronavirus: कोरोना संकट तरीही मंत्रिमंडळ नाही, एकटे मुख्यमंत्री करतायेत कारभार; काँग्रेसचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 12:23 IST

मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते.

नवी दिल्ली – मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसनेभाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असताना एक महिन्यानंतरही मंत्रिमडळ स्थापन करण्यात आलं नाही. लोकांच्या आरोग्यापेक्षा सत्तेला प्राधान्य दिल्याचा आरोप काँग्रेसनेभाजपावर केला आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विट करुन म्हटलं आहे की, भाजपानं सत्तेला प्राधान्य दिल्याने हजारो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. मध्य प्रदेशात जवळपास एक महिन्यानंतरही मंत्रिमंडळ स्थापन केलं नाही. आरोग्य संकट असताना भाजपाने विलंब का केला? लोकांच्या आरोग्यापेक्षा भाजपाने सत्तेला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते. सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकमेव शिवराज चौहान मुख्यमंत्री म्हणून आहेत. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य मंत्र्यांची गरज होती. जो आरोग्य खातं सांभाळून कोरोनाविरुद्ध सख्त निर्णय घेऊ शकतं. मध्य प्रदेशात १ हजार ३१० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे भयंकर आहेत असा आरोप काँग्रेसने भाजपावर केला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी भाजपाकडे मास्टर प्लॅन आहे का? आतापर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही, अनेक आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. तसेच ज्या आमदारांनी काँग्रेसला फसवलं त्यांना टार्गेट करत म्हटलं आहे की, आमच्याशी धोका विसरुन जाऊ पण मध्य प्रदेशातील जनता हे विसरणार नाही. कोरोनाला जबाबदार भाजपा सरकार अशाप्रकारे त्यांनी ट्विटरवर हॅशटॅग वापरला आहे.

मध्य प्रदेशात गेल्या महिन्यात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०६ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सभागृहात बहुमत सिद्ध केलं.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश