शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Coronavirus: कोरोना संकट तरीही मंत्रिमंडळ नाही, एकटे मुख्यमंत्री करतायेत कारभार; काँग्रेसचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 12:23 IST

मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते.

नवी दिल्ली – मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसनेभाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असताना एक महिन्यानंतरही मंत्रिमडळ स्थापन करण्यात आलं नाही. लोकांच्या आरोग्यापेक्षा सत्तेला प्राधान्य दिल्याचा आरोप काँग्रेसनेभाजपावर केला आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विट करुन म्हटलं आहे की, भाजपानं सत्तेला प्राधान्य दिल्याने हजारो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. मध्य प्रदेशात जवळपास एक महिन्यानंतरही मंत्रिमंडळ स्थापन केलं नाही. आरोग्य संकट असताना भाजपाने विलंब का केला? लोकांच्या आरोग्यापेक्षा भाजपाने सत्तेला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते. सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकमेव शिवराज चौहान मुख्यमंत्री म्हणून आहेत. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य मंत्र्यांची गरज होती. जो आरोग्य खातं सांभाळून कोरोनाविरुद्ध सख्त निर्णय घेऊ शकतं. मध्य प्रदेशात १ हजार ३१० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे भयंकर आहेत असा आरोप काँग्रेसने भाजपावर केला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी भाजपाकडे मास्टर प्लॅन आहे का? आतापर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही, अनेक आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. तसेच ज्या आमदारांनी काँग्रेसला फसवलं त्यांना टार्गेट करत म्हटलं आहे की, आमच्याशी धोका विसरुन जाऊ पण मध्य प्रदेशातील जनता हे विसरणार नाही. कोरोनाला जबाबदार भाजपा सरकार अशाप्रकारे त्यांनी ट्विटरवर हॅशटॅग वापरला आहे.

मध्य प्रदेशात गेल्या महिन्यात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०६ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सभागृहात बहुमत सिद्ध केलं.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश