शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

CoronaVirus: यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 13:36 IST

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकेंद्र सरकारवर टीकास्त्रकाँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेची मदत करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आणखीनच गंभीर होताना पाहायला मिळत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला  या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. यंत्रणा कोलमडली आहे. आता 'जन की बात' करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (rahul gandhi criticised pm narendra modi on mann ki baat)

अलीकडेच राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते गृह विलगीकरणात आहेत. राहुल गांधी सातत्याने देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला. यावरून आता राहुल गांधी यांनी टीका केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी

काय म्हणतात राहुल गांधी?

यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS 

केंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट

केंद्र सरकारच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला. स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. 

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ रुग्ण उपचाराधीन आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMan ki Baatमन की बातPoliticsराजकारण