शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

coronavirus : जनतेला सप्तसूत्री देणाऱ्या मोदींवर काँग्रेसने डागले सात तिखट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:18 IST

लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्यावतीने केंद्र सरकारला सात प्रश्न विचारले आहेतसरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यातकोरोनाला रोखण्यासाठी मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान जनतेला सात सूत्रांचे पालन करण्याचे आवाहन केले होते

नवी दिल्ली - 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करत लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान जनतेला सात सूत्रांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या सप्तसूत्रीवरून काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे. लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्यावतीने केंद्र सरकारला सात प्रश्न विचारले आहेत. तसेच या प्रश्नांचे उत्तर देण्याचे आव्हान केंद्र सरकारला दिले आहे. 

1-  कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे टेस्टिंग. 1 फेब्रुवारीपासून 13 एप्रिलपर्यंत देशात केवळ 2 लाख 17 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्राकडे काय योजना आहे. 

2 - आघाडीवर राहून कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यासाठी आतापर्यंत एन-95 मास्क आणि पीपीई किट्सची मोठया प्रमाणात टंचाई आहे. याबाबत केंद्र सरकार गप्प का? ही साधने कधी उपलब्ध होतील. 

3 - कोरोनामुळे स्थलांतर केलेले कोट्यवधी मजूर आज रोजगार आणि रोजीरोटीसाठी झगडत आहेत. याबाबत तुमच्याकडे काय योजना आहे. 

4 - लाखो एकर गहू आणि इतर पिके कापणीला आली आहेत. मात्र त्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही. तसेच हमीभावाने धान्य खरेदी करण्याबाबत सरकार गप्प का आहे. शेती आणि शेतकरी सरकारच्या प्राधान्यक्रमात बसत नाहीत का?

5 - कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वीच देश बेरोजगारीशी झुंजत होता. आता बेरोजगारीचा दर भयानक रूप घेत आहे. अशा परिस्थितीत तुमचे कोविड-19 इकॉनॉमिक रिकव्हरी टास्कफोर्स कुठे आहे?

6 - देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले दुकानदार, लघु-मध्यम उद्योग देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. यांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याबाबत काय योजना आहे. 

7 - जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अब्जावधी च्या मदतीची घोषणा होत आहे. मग या यादीत आपले सरकार शेवटच्या स्थानावर का? सरकारची नियत आणि नीती देशाला भारी पडत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस