शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

coronavirus: रेल्वेंसाठी राज्यांकडून असहकार्य असल्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:20 IST

श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत. परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत.

- नितीन अग्रवाल  नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत वेगवेगळ््या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत.परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत. शेवटी केंद्र सरकारने राज्यांना म्हटले की, मजुरांच्या प्रवासात अडथळे आणू नका. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र पाठवले आहे.मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांच्या राज्यांसोबत झालेल्या बैठकीचा आधार घेऊन भल्ला म्हणाले की, मजुरांनी रेल्वे मार्गांनी किंवा रस्त्याने पायी येणे मोठ्या चिंतेचे कारण आहे. हे मजूर घरी पोहोचण्यासाठी बस व रेल्वेंना मंजुरी दिली गेली आहे.सर्व राज्यांनी मजूर, कामगार रेल्वेमार्ग किंवा रस्त्यांनी पायी गावाकडे निघणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर असे मजूर, कामगार दिसले तर त्यांना रेल्वे किंवा बसद्वारे त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी व दरम्यान जवळच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जावी.रेल्वे व गृह मंत्रालयाने हा वाद सोडवण्यासाठी राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली. या चर्चेत असे ठरले की, येत्या काही आठवड्यांत १०० श्रमिक रेल्वे चालवून अडकून पडलेल्या मजुरांना काढून नेण्याचे काम केले जाईल.लॉकडाऊन तीन पूर्ण व्हायच्या आत सरकार अडकून पडलेल्या सगळ््या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचू इच्छिते. परंतु, राज्यांनी मंजुरी न दिल्यामुळे आतापर्यंत फक्त 5.6 लाख मजुरांनाच त्यांच्या घरी पोहोचवता आले. अजूनही मोठ्या संख्येने मजूर अनेक ठिकाणी अडकून पडलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार