शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

coronavirus: रेल्वेंसाठी राज्यांकडून असहकार्य असल्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:20 IST

श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत. परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत.

- नितीन अग्रवाल  नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत वेगवेगळ््या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत.परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत. शेवटी केंद्र सरकारने राज्यांना म्हटले की, मजुरांच्या प्रवासात अडथळे आणू नका. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र पाठवले आहे.मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांच्या राज्यांसोबत झालेल्या बैठकीचा आधार घेऊन भल्ला म्हणाले की, मजुरांनी रेल्वे मार्गांनी किंवा रस्त्याने पायी येणे मोठ्या चिंतेचे कारण आहे. हे मजूर घरी पोहोचण्यासाठी बस व रेल्वेंना मंजुरी दिली गेली आहे.सर्व राज्यांनी मजूर, कामगार रेल्वेमार्ग किंवा रस्त्यांनी पायी गावाकडे निघणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर असे मजूर, कामगार दिसले तर त्यांना रेल्वे किंवा बसद्वारे त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी व दरम्यान जवळच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जावी.रेल्वे व गृह मंत्रालयाने हा वाद सोडवण्यासाठी राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली. या चर्चेत असे ठरले की, येत्या काही आठवड्यांत १०० श्रमिक रेल्वे चालवून अडकून पडलेल्या मजुरांना काढून नेण्याचे काम केले जाईल.लॉकडाऊन तीन पूर्ण व्हायच्या आत सरकार अडकून पडलेल्या सगळ््या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचू इच्छिते. परंतु, राज्यांनी मंजुरी न दिल्यामुळे आतापर्यंत फक्त 5.6 लाख मजुरांनाच त्यांच्या घरी पोहोचवता आले. अजूनही मोठ्या संख्येने मजूर अनेक ठिकाणी अडकून पडलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार