शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; ७० टक्के प्रभावी असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:17 IST

Coronavirus in India: कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात भारताने सुरू केलेल्या लढ्यात आता आणखी एका प्रभावी औषधाची भर पडली आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे. स्वित्झर्लंड येथील रोशे या कंपनीने सिप्लाच्या सहकार्याने हे औषध भारतात दाखल केले आहे. हे औषध कोणत्याही कोरोना रुग्णाला दिले तरी ते ७० टक्के परिणामकारक ठरते. हे औषध घेतल्यास कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचा प्रसंग टाळू शकतो. भारतामध्ये कॉकटेल ड्रग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिप्ला कंपनीने स्वीकारली आहे. हे औषध सध्या देशात काही विशिष्ट शहरांमधील काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसे त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येईल. सिप्लाव्यतिरिक्त झायडस कंपनीनेही या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग हे एक प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर ४८ ते ७२ तासांमध्ये त्याला हे औषध दिले जाते. ते देण्यासाठी २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. कॉकटेल ड्रग दिल्यानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीवर  किमान अर्धा-पाऊण तास लक्ष ठेवले जाते. 

...असे काम करते कॉकटेल ड्रगnकॉकटेल ड्रग हे काही औषधांचे मिश्रण आहे. ते घेतल्याने रुग्णाची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. या औषधात कासिरिविमाब व इम्डेव्हीमाब या औषधांचा समावेश आहे. nया दोन्ही औषधांचे प्रत्येकी ६०० मिलिग्रॅम मिश्रण तयार करून कॉकटेल ड्रग बनवितात. nकॉकटेल ड्रग कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये शिरकाव करण्यापासून रोखते. त्यामुळे विषाणूला प्रथिने मिळत नाहीत व त्याचे उत्परिवर्तन होण्यास प्रतिबंध करता येतो. 

कोरोनाचे नवे २.११ लाख  रुग्ण; ३,८४७ मृत्यूभारतात २४ तासांत कोरोनाचे नवे २ लाख ११ हजार २९८ रुग्ण आढळले तर ३,८४७ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ झाली असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के आहे. बुधवारी २१ लाख ५७ हजार ८५७ चाचण्या केल्या गेल्या. यामुळे देशात एकूण ३३ कोटी ६९ लाख ६९ हजार ३५३ चाचण्या झाल्या आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर हा ९.७९ टक्के असून गेल्या सलग तीन दिवसांत तो दहा टक्क्यांच्या खाली राहिला आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत