शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Coronavirus: कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; ७० टक्के प्रभावी असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:17 IST

Coronavirus in India: कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात भारताने सुरू केलेल्या लढ्यात आता आणखी एका प्रभावी औषधाची भर पडली आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे. स्वित्झर्लंड येथील रोशे या कंपनीने सिप्लाच्या सहकार्याने हे औषध भारतात दाखल केले आहे. हे औषध कोणत्याही कोरोना रुग्णाला दिले तरी ते ७० टक्के परिणामकारक ठरते. हे औषध घेतल्यास कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचा प्रसंग टाळू शकतो. भारतामध्ये कॉकटेल ड्रग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिप्ला कंपनीने स्वीकारली आहे. हे औषध सध्या देशात काही विशिष्ट शहरांमधील काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसे त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येईल. सिप्लाव्यतिरिक्त झायडस कंपनीनेही या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग हे एक प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर ४८ ते ७२ तासांमध्ये त्याला हे औषध दिले जाते. ते देण्यासाठी २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. कॉकटेल ड्रग दिल्यानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीवर  किमान अर्धा-पाऊण तास लक्ष ठेवले जाते. 

...असे काम करते कॉकटेल ड्रगnकॉकटेल ड्रग हे काही औषधांचे मिश्रण आहे. ते घेतल्याने रुग्णाची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. या औषधात कासिरिविमाब व इम्डेव्हीमाब या औषधांचा समावेश आहे. nया दोन्ही औषधांचे प्रत्येकी ६०० मिलिग्रॅम मिश्रण तयार करून कॉकटेल ड्रग बनवितात. nकॉकटेल ड्रग कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये शिरकाव करण्यापासून रोखते. त्यामुळे विषाणूला प्रथिने मिळत नाहीत व त्याचे उत्परिवर्तन होण्यास प्रतिबंध करता येतो. 

कोरोनाचे नवे २.११ लाख  रुग्ण; ३,८४७ मृत्यूभारतात २४ तासांत कोरोनाचे नवे २ लाख ११ हजार २९८ रुग्ण आढळले तर ३,८४७ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ झाली असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के आहे. बुधवारी २१ लाख ५७ हजार ८५७ चाचण्या केल्या गेल्या. यामुळे देशात एकूण ३३ कोटी ६९ लाख ६९ हजार ३५३ चाचण्या झाल्या आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर हा ९.७९ टक्के असून गेल्या सलग तीन दिवसांत तो दहा टक्क्यांच्या खाली राहिला आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत