शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी जनतेला होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:23 IST

coronavirus in India : कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे, तसेच गोरगरिबांचे मोठ्या प्रमामात हात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून, या लाटेमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर इतरही काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे, तसेच गोरगरिबांचे मोठ्या प्रमामात हात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Central government's major decision against the backdrop of increasing coronavirus infection, 80 crore people will benefit Free Food)

देशातील अनेक राज्यात वाढलेला कोरोना आणि कोरोनाला रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्याचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मे आणि जून महिन्यांमध्ये गरीबांना प्रत्येकी पाच किलो धान्य दिले जाणार आहे.  या योजनेचा लाभ देशातील तब्बल ८० कोटी जनतेला होणार असून, यासाठी केंद्र सरकारने तब्बल २६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

या निर्णयावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कोरोनाच्या दुसऱ्या साथीचा सामना करत असताना हा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. सुमारे २६ हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च होणार आहेत. 

दरम्यान, देशात कोरोनाच्या विषाणूचा फैलाव अधिकच वाढत चालला आहे. आज देशभरात कोरोनाच्या ३ लाख ३२ हजार ७३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात देशभरात तब्ब्ल २२६३ रुग्णांचा मृत्यू झाला.  तर दिवसभऱात १ लाख ९३ हजार २७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतfoodअन्न