शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

Coronavirus: लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु; केंद्र सरकारने गरीबांसाठी बनवला ३ महिन्याचा मेगा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 17:24 IST

केंद्र सरकारनेही कामगारांच्या समस्यांची विशेष काळजी घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्देकामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेषतः देशभरात २० तक्रार केंद्रे सुरूआरटीपीसीआर ३३ लाख किटसाठी तर ३७ लाख जलद चाचणी किटसाठी ऑर्डर दिल्या आहेत ५ किलो गहू अथवा तांदूळ प्रत्येक महिन्याला मोफत देण्याचा निर्णय

नवी दिल्ली – देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्याचसोबत गरीबांसाठी दिलासादायक योजनाही बनवण्यात आली आहे. केंद्र सरकार पुढील ३ महिने ८० कोटी गरीबांना प्रत्येक महिन्याकाठी ५ किलो धान्य मोफत देणार आहे. आरोग्य, गृह मंत्रालय आणि भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.

गृह मंत्रालयाचे प्रवक्त्या पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा नियंत्रणात आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून जवळपास ८० कोटी लोकांना पुढील तीन महिने त्यांच्या पसंतीनुसार ५ किलो गहू अथवा तांदूळ प्रत्येक महिन्याला मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अतिरिक्त धान्य पुरवठा करण्यात आला आहे. १३ एप्रिल २०२० पर्यंत २२ लाख टनपेक्षा अधिक धान्य एफसीआयमधून काढण्यात आलं आहे. गृह मंत्रालयाची कंट्रोल रुम २४ तास अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंवर लक्ष ठेवणार आहे. गरजू लोकांसाठी हेल्पलाईन सुविधाही सुरु करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारनेही कामगारांच्या समस्यांची विशेष काळजी घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कामगार व रोजगार मंत्रालयाने कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेषतः देशभरात २० तक्रार केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे मुख्य कामगार आयुक्तांच्या देखरेखीखाली कार्यरत आहेत. हेल्पलाईनची सविस्तर माहिती कामगार व रोजगार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २६ मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. १३ एप्रिलपर्यंत ३२ कोटी लाभार्थ्यांना डीबीटीमार्फत २९ हजार ३५२ कोटी रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ कोटी २९ लाख लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे.

तर बँक खात्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम काढून घेण्यासाठी बँकांचे पुढे असलेल्या गर्दीकडे सरकारचे लक्ष आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बचत गटांशी संबंधित महिलांची मदत घेतली जात आहे. बँक सखी, पीएम जनधन योजना, पंतप्रधान किसान योजना खाती आणि रोजगार हमी योजनेंतर्गत खात्यात येणारी रक्कम क्षेत्र पातळीवरील स्वयंसेवी सहाय्य गटाच्या महिला, लाभार्थींना बँकेत न जाता मिळतील, या कामात सहकार्य केले जाईल असं आरोग्य विभागाचे प्रवक्ते लव अग्रवाल यांनी सांगितले.

त्याचसोबत देशात कोरोना टेस्ट किटची कमतरता नाही. आमच्याकडे बरीच चाचणी किट आहेत जी पुढील 6 आठवड्यांसाठी चालतील. आमच्याकडे आरटीपीसीआर किट्स देखील आहेत. त्याशिवाय आम्ही सुमारे आरटीपीसीआर ३३ लाख किटसाठी तर ३७ लाख जलद चाचणी किटसाठी ऑर्डर दिल्या आहेत अशी माहिती आयसीएमआरने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या