शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

coronavirus: जनगणना, एनपीआरचे काम वर्षभर लांबणीवर पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 05:26 IST

भारतात जनगणना हे जगातील सगळ््यात मोठे असे प्रशासकीय व सांख्यिकीय नोंदणीचे काम आहे. या कामात ३० लाख अधिकाऱ्यांचा सहभाग असतो व ते देशातील प्रत्येक घरी जाऊन भेट घेतात.

नवी दिल्ली : जनगणनेचा पहिला टप्पा आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्याचे काम यावर्षी सुरू केले जाणार होते. परंतु, कोरोना विषाणूची साथ आल्यामुळे व ती थांबण्याचीही चिन्हे दिसत नसल्यामुळे हे काम सुरू व्हायला वर्षभर उशीर लागणार, असे दिसते.भारतात जनगणना हे जगातील सगळ््यात मोठे असे प्रशासकीय व सांख्यिकीय नोंदणीचे काम आहे. या कामात ३० लाख अधिकाऱ्यांचा सहभाग असतो व ते देशातील प्रत्येक घरी जाऊन भेट घेतात.‘जनगणना ही याक्षणी अत्यावश्यक बाब नाही. त्या कामाला वर्षभर जरी उशीर झाला तरी त्याने फार काही बिघडणार नाही,’ असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. हा अधिकारी म्हणाला की, २०२१ च्या जनगणना मोजणीचा पहिला टप्पा व एनपीआर अद्ययावत करण्याचे काम कधी सुरू होईल याचा अंतिम निर्णय झालेला नाही. पण हे स्पष्ट आहे की, हे काम कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता यावर्षी (२०२०) निश्चित होणार नाही. जनगणनेत घरांची यादी करण्याचा टप्पा आणि एनपीआर अद्ययावत करण्याचे काम संपूर्ण देशभर एक एप्रिल ते ३० सप्टेंबरदरम्यान करण्याचे ठरले होते. परंतु, आता कोविड-१९ च्या उद्रेकामुळे ते लांबणीवर पडलेआहे.या कामांमध्ये लक्षावधींच्या संख्येत अधिकाºयांचा सहभाग असतो व ते प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेटतात. त्यामुळे आम्ही त्यांचे आरोग्य धोक्यात घालू शकत नाहीत, असे हा अधिकारी म्हणाला.देशात फक्त एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या ७८ हजार ७६१ एवढी विक्रमी नोंदली गेली व त्यामुळे रविवारी एकूण रुग्णांची संख्या ३५ लाख ४२ हजार ७३३ एवढी झाली. ६३ हजार ४९८ जण कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडले.आधीच्या नियोजनानुसार जनगणनेचे काम एक मार्च २०२१ रोजी तर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये एक आॅक्टोबर २०२० रोजी करण्याचे ठरले होते.कोरोनाचे संकट वाढत असून जनगणना व एनपीआर अद्ययावत करणे याला याक्षणी प्राधान्य नाही, असे दुसºया अधिकाºयाने सांगितले. यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले तेव्हा देशाचे रजिस्ट्रार जनरल आणि लोकसंख्या आयुक्त यांनी एक एप्रिलपासून सुरू होणाºया जनगणना आणि एनपीआर अद्ययावत करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करण्याची तयारी केली होती. काही राज्यांनी एनपीआर अद्ययावत करण्यास विरोध केला तरी जनगणनेला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे.जनगणनेमुळे धोरणांची आखणी करायला मदतजनगणनेमुळे सरकारला वेगवेगळ्या धोरणांची आखणी करायला मोठी मदत होते. दर दहा वर्षांनी लोकसंख्या मोजली जाते.एनपीआर रजिस्टर हे सामान्यत: देशाच्या रहिवाशांचे असते. ते स्थानिक (खेडे, उपनगर), उपजिल्हा, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नागरिकत्व कायदा, १९५५ आणि नागरिकत्व नियम २००३ अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार अद्ययावत केले जाते.२०१० मध्ये एनपीआरसाठी शेवटची माहिती गोळा केली गेली होती.२०१५ मध्ये घरोघरी जाऊन पाहणी करून ही माहिती अद्ययावत केली गेली होती.२०१५ मध्ये रजिस्टर अद्ययावत करताना सरकारने लोकांना आधार कार्डचा क्रमांक आणि मोबाईल फोन क्रमांक मागितला होता. यावेळी लोकांना वाहन चालवण्याचा परवाना व मतदार ओळखपत्राचा तपशील मागितला जाऊ शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत