शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
2
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
3
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
4
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
5
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
6
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
7
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
8
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
9
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
10
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
11
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
12
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
13
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
14
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
15
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
16
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
17
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
18
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
19
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
20
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:03 IST

बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी संशोधकांना एक नवीन आशेचा किरण दिसला आहे. भारतात गेल्या ७२ वर्षांपासून बीसीजीची लस लहान मुलांना टोचली जाते. आता जग या लसीला कोरोनाविरोधात लढण्यासाठी ढाल मानू लागले आहे. 


न्यूयॉर्क इंन्सि्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनच्या बायोमेडिकल सायन्स विभागाने केलेल्या एका अभ्यासामघ्ये अमेरिका आणि इटली सारख्या देशांमध्ये बीसीजी लसीकरण योजना नाहीय. यामुळे या देशांमधये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूही होत आहेत. तर जपान आणि ब्राझिल देशांमध्ये या दोन्ही देशांच्या तुलनेत कोरोनाचे बळी कमी आहेत. 


बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते. जगात या लसीचा पहिल्यांदा वापर १९२० मध्ये झाला होता. ब्राझीलसारख्या देशामध्ये या लसीचा वापर होत आहे. 
दिलासादेणारी बाब म्हणजे भारतातही ही लस नवजात बालकांना दिली जाते. या अभ्यासामध्ये असे आढळून आले की ही लस न देणाऱ्या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये अमेरिका, लेबनॉन, नेदरलँड आणि बेल्जिअम हे देश आहेत. तर जपान, ब्राझील, चीन, भारत या देशांमध्ये ही लस दिली जाते. चीनमध्येच कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने चीनला अपवाद ठेवण्यात आले आहे. 


या अभ्यासामध्ये ज्या देशांमध्ये बीसीजी लस देण्यात येते त्या ठिकाणी कोरोनाचे बळी कमी आहेत. ज्या देशांमध्ये आधीपासून बीसीजी लस देण्यात येत आहे तिथे कोरोनाचा धोका दहा पटींनी कमी झालेला आहे. तर ईराणमध्ये १९८४ मध्ये ही लस देण्यास सुरुवात झाली यामुळे तिथे ३६ वर्षांखालील नागरिकांना ही लस दिलेली आहे. मात्र, वृद्धांना लस दिलेली नसल्याने त्या देशात कोरोनाचा धोका जास्त आहे. 


या अहवालामध्ये भारताचे नाव नसले तरीही हे निष्कर्ष भारतासाठी आनंदाचे आहेत. कारण बीसीजी लस भारतात १९४८ मध्ये देण्यास सुरुवात करण्यात आली होती. हा प्रायोगिक प्रयोग होता. मात्र, नंतर १९४९ पासून देशभरात शाळांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आले. १९५१ पासून मोठ्या प्रमाणावर लसीकरण वाढविण्यात आले. तर राष्ट्रीय टीबी योजना सुरू झाली तेव्हा १९६२ पासून जन्मताच बीसीजी लस देण्यात येऊ लागली. हा विचार केल्यास भारतात मोठ्या लोकसंख्येला बीसीजी लस देण्यात आली आहे. सध्या जन्माला येणाऱ्या ९७ टक्के बालकांना ही लस दिली जाते. 
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या