शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

coronavirus: दिल्ली, मुंबईत कोरोनाच्या सामुहिक संसर्गाचा धोका, एम्सच्या संचालकांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 22:58 IST

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि दिल्लीत वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये सामुहिक संसर्गाची शक्यता वाढत आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर मोठे आव्हान  उभे राहिले आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि दिल्लीत वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये सामुहिक संसर्गाची शक्यता वाढत आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये सामुहिक संसर्ग झाला असल्याची शंका आहे. त्यामुळे या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी भीती व्यक्त केली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना गुलेरिया म्हणाले की, संपूर्ण देशातील परिस्थिती पाहिल्यास काही शहरे अशी आहेत जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील सत्तर ते ऐंशी टक्के रुग्ण याच शहरांमध्ये सापडत आहेत. सद्यस्थितीत दिल्ली, मुंबई, इंदूर आणि अहमदाबाद येथे कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. तर देशातील इतर भागात कोरोनाचे तितकेसे रुग्ण सापडलेले नाहीत. 

देशातील बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाहीत, काही ठिकाणी आता रुग्णसंख्या कमी होत आहे. देशात सामुहिक संसर्ग झालेला नाही. मात्र दिल्ली आणि मुंबईत सामुहिक संसर्ग झाला असावा, अशी शंका आहे. जर दिल्ली आणि मुंबईत सामुहिक संसर्ग झाला असेल, तर त्याला रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे गुलेरिया यांनी सांगितले. 

ज्या भागात सामुहिक संसर्ग झाला आहे तेथील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे दिसत नसलेले आहेत. त्यामुळे जे लोक बाहेर पडत आहेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्यासमोर किंवा सोबत जो कुणी आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. तसेच तो आजार पसरवू शकतो. त्यामुळे जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, असा सल्ला गुलेरिया यांनी दिला  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतdelhiदिल्लीMumbaiमुंबई