शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

coronavirus: दिल्ली, मुंबईत कोरोनाच्या सामुहिक संसर्गाचा धोका, एम्सच्या संचालकांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 22:58 IST

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि दिल्लीत वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये सामुहिक संसर्गाची शक्यता वाढत आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर मोठे आव्हान  उभे राहिले आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि दिल्लीत वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये सामुहिक संसर्गाची शक्यता वाढत आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये सामुहिक संसर्ग झाला असल्याची शंका आहे. त्यामुळे या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी भीती व्यक्त केली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना गुलेरिया म्हणाले की, संपूर्ण देशातील परिस्थिती पाहिल्यास काही शहरे अशी आहेत जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील सत्तर ते ऐंशी टक्के रुग्ण याच शहरांमध्ये सापडत आहेत. सद्यस्थितीत दिल्ली, मुंबई, इंदूर आणि अहमदाबाद येथे कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. तर देशातील इतर भागात कोरोनाचे तितकेसे रुग्ण सापडलेले नाहीत. 

देशातील बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाहीत, काही ठिकाणी आता रुग्णसंख्या कमी होत आहे. देशात सामुहिक संसर्ग झालेला नाही. मात्र दिल्ली आणि मुंबईत सामुहिक संसर्ग झाला असावा, अशी शंका आहे. जर दिल्ली आणि मुंबईत सामुहिक संसर्ग झाला असेल, तर त्याला रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे गुलेरिया यांनी सांगितले. 

ज्या भागात सामुहिक संसर्ग झाला आहे तेथील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे दिसत नसलेले आहेत. त्यामुळे जे लोक बाहेर पडत आहेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्यासमोर किंवा सोबत जो कुणी आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. तसेच तो आजार पसरवू शकतो. त्यामुळे जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, असा सल्ला गुलेरिया यांनी दिला  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतdelhiदिल्लीMumbaiमुंबई