शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

coronavirus: चिंताजनक! देशातील या पाच राज्यांतच कोरोनाचे ८० टक्के रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:16 IST

महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे.

- एस. के. गुप्ता  नवी दिल्ली : देशातील पाच राज्ये आणि अर्धा डझन शहरांतच कोरोना विषाणूचे (कोविड-१९) ८० टक्के रुग्ण आहेत. केंद्र सरकार याच राज्यांवर लक्ष केंद्रीत करून कोरोना वेगाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. केरळ मॉडेलचा अवलंब करून कोविड-१९ विरोधातील युद्ध जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे. ही राज्ये व या शहरांत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या तुकड्या पाठवल्या आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जी राज्ये कोरोनामुक्त आहेत त्यांच्यावरही केंद्राचे लक्ष आहे. या राज्यांत गोवा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि केंद्रशासित प्रदेशांत अंदमान व निकोबार, दादरा व नगरहवेलीचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी ईशान्य भारतातील राज्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या राज्यांनी त्यांच्याकडे येणारे विदेशी नागरिक व इतर राज्यांतून येणाऱ्यांचे होम क्वारंटाईन व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून घ्यावे. राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत.05 राज्यांत आणि अर्धा डझन शहरांत केंद्राची आयसीएमटीची तुकडी गेली आहे तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा सल्ला दिला गेला आहे. ज्या राज्यांत कोरोनामुळे मृत्यू जास्त झाले तेथे कोरोनाचे रुग्ण कमी दाखवले गेले आहेत. स्थिती तेथे जास्त काळजीची आहे. कारण तेथून आकडेवारी अचूक येत नाही.185 लोकांचा पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे व तेथे १९३९ रुग्ण असल्याचे सांगितले जाते. आंध्र प्रदेशमध्ये १९८० रुग्ण व ४५ मृत्यू आहेत. राजस्थानात पश्चिम बंगालपेक्षा दुपट्ट रुग्ण असून मृत्यू १०७ आहेत. तमिळनाडूत ४७ तर दिल्लीत ७३ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीTamilnaduतामिळनाडू