शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

coronavirus: ट्रिपल टेस्टिंग, आयसोलेशनसाठी रेल्वेचे ५०० कोच; देशाच्या राजधानीला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्राने कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 16:23 IST

कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे.

ठळक मुद्देदेशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटापासून रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध दिल्लीत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पुढील सहा दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवून तिप्पट केले जाईलकोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दिल्लीला रेल्वेचे ५०० कोच उपलब्ध करून देणार

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अमित शाह यांनी व्यापक अँक्शन प्लॅनची घोषणा केली आहे. 

या बैठकीनंतर अमित शाह यांनी सांगितले की, देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटापासून रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. दिल्लीत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी  पुढील दोन दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवून दुप्पट केले जाईल. तर सहा दिवसांनंतर हे प्रमाण तिप्पट केले जाईल. 

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-१९ चा तपास केंद्र सुरू केले जाईल. तसेच संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हॉटस्पॉट भागांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दिल्लीला रेल्वेचे ५०० कोच उपलब्ध करून देणार आहे, अशी माहितीही अमित शाह यांनी दिली.

तसेच कोरोनामुळे वाढत असलेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कारांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील. त्याबरोबरच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दिल्लीला अजून पाच वरिष्ठ अधिकारी देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजारांवर पोहोचला आहे. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतAmit Shahअमित शहाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल