शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

coronavirus: ट्रिपल टेस्टिंग, आयसोलेशनसाठी रेल्वेचे ५०० कोच; देशाच्या राजधानीला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्राने कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 16:23 IST

कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे.

ठळक मुद्देदेशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटापासून रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध दिल्लीत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पुढील सहा दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवून तिप्पट केले जाईलकोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दिल्लीला रेल्वेचे ५०० कोच उपलब्ध करून देणार

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अमित शाह यांनी व्यापक अँक्शन प्लॅनची घोषणा केली आहे. 

या बैठकीनंतर अमित शाह यांनी सांगितले की, देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटापासून रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. दिल्लीत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी  पुढील दोन दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवून दुप्पट केले जाईल. तर सहा दिवसांनंतर हे प्रमाण तिप्पट केले जाईल. 

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-१९ चा तपास केंद्र सुरू केले जाईल. तसेच संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हॉटस्पॉट भागांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दिल्लीला रेल्वेचे ५०० कोच उपलब्ध करून देणार आहे, अशी माहितीही अमित शाह यांनी दिली.

तसेच कोरोनामुळे वाढत असलेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कारांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील. त्याबरोबरच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दिल्लीला अजून पाच वरिष्ठ अधिकारी देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजारांवर पोहोचला आहे. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतAmit Shahअमित शहाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल