शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 400 डॉक्टरांचा मृत्यू, दिल्लीतील १०० डॉक्टरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 06:46 IST

Coronavirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसापासून दररोज होणारे मृत्यू वाढले आहेत. मात्र, यावेळी वैद्यकीय क्षेत्राला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झालेला दिसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जास्त जीवघेणी ठरली आहे. दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या जास्त आहे. या लाटेत देशभरातील ४०० हून अधिक डॉक्टारांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकट्या दिल्लीतील १०० डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसापासून दररोज होणारे मृत्यू वाढले आहेत. मात्र, यावेळी वैद्यकीय क्षेत्राला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झालेला दिसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १०० डॉक्टर्स एकट्या दिल्लीतील आहेत. ही आकडेवारी देशातील सध्याच्या परिस्थितीत सरकारची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे वैद्यकीय क्षेत्रावर प्रचंड ताण आलेला आहे. दररोजची रुग्णसंख्या अजूनही अडीच लाखाच्यावर आहे. अशास्थितीत देशाला डॉक्टरांची गरज भासणार आहे. 

सलग सहाव्या दिवशी तीन लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंदकोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होत आहे. गेल्या २४ तासांममध्ये २ लाख ५७ हजार २९९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण बरे झाले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. देशात सलग सहाव्या दिवशी तीन लाखांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९०वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटून २९ लाख २३ हजार ४०० पर्यंत घटली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटही वाढून ८७.७६ टक्क्यांवर पोहोचलाआहे. ४ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपासून मृतांचा आकडा ४ हजारांच्या वर असून त्यात घट होत नसल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ८६ हजार ६१८ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये २४,२०७, दिल्लीत २२,८३१, तामिळनाडूत १९,५९८, उत्तर प्रदेशात १८,७६० आणि पश्चिम बंगालमध्ये १४ हजार ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक १२६३ मृत्यू महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर तामिळनाडूत ४६७, कर्नाटकमध्ये ३५३, दिल्लीत २५२ आणि उत्तर प्रदेश तसेच पंजाबमध्ये प्रत्येकी १७२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये घट होत असल्याची दिलासादायक बाब असली तरी मृत्यूचे प्रमाण घटत नाही. दररोज ४ हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. एकूण २ लाख ९५ हजार ५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर १.१२ टक्के एवढा असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.कॅनडाकडून विमानसेवेवर निर्बंध कायमभारतातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे कॅनडाने भारत आणि पाकिस्तानातून दाखल होणाऱ्या प्रवासी विमानांवरील बंदी आणखी ३० दिवसांनी वाढविली आहे. ही बंदी २१ जूनपर्यंत लागू राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारत