शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

 coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 09:17 IST

coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच 

मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या काळात समाजसेवक अन् मदतीनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येतंय. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन स्वयंस्फूर्तीने हे समाजसेवक आपल्या दानशूर व्यक्तीत्वाचा बडेजावपणा सांगताना दिसत आहेत. एखाद्या गरिबाला थोडसं अन्न द्यायचं अन् १० जणांनी एकत्र येऊन फोटो काढायचा, जणू आता या गरिबाचा सगळा खर्च तेच करणार आहेत. विजेंदरने अशा समाजसेवा करणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. एका शायरीच्या माध्यमातून विजेंदरने अशा स्वयंस्फूर्ती समाजसेवकांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर किराणा दुकाना आणि अत्यावश्यक सेवेच्या मालासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र, गरिब आणि मजदूर वर्गाची मोठी उपासमार या काळात होताना दिसून आली. या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेत गरिबांना मदतीचा हात दिला. मात्र, या परिस्थितीत तोडकीशी मदत करत, फोटोसेशन आणि भंकपणाही होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात हा दिखाऊपणा दिसून येतो. अनेकांनी केवळ पब्लिसिटी स्टंटसाठीच या मदतीचा उपयोग केला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. नेहमीच आपले मत स्पष्टपणे मांडणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंगने शायरीतून यावर प्रकाश टाकलाय. विजेंदर सिंगच्या या शायरीवर काँग्रेस नेते माजी आमदार मुकेश शर्मा यांनीही समर्थनार्थ दोन ओळी लिहिल्या आहेत. 

ग़रीबी की क्या ख़ूब हँसी उड़ाई जा रही है,1 रोटी देकर 100 तस्वीर खिंचाई जा रही है ।

बॉक्सर विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरु विचार करण्यासारखा विचार मांडला आहे. हजारो युजर्संने विजेंदरचं हे ट्विट रिट्विट करत, हे म्हणणं अतिशय बरोबर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी हा भाजपा समर्थकांना टोला असल्याचे समजून विजेंदरलाही तूझं तूझं काम करावं, असा सल्ला दिलाय. पण, बहुतांश युजर्संना त्याचं हे ट्विट आवडल्याचं दिसून येतंय. 

तथाकथित नेता व समाज सेवक गरीबों को जलील करना बंद करें! असे  म्हणत मुकेश शर्मा यांनी विजेंदरने अगदी सत्य लिहिल्याचं म्हटलंय. 

‘लॉकडाऊन’चे बºयापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून, या कठोर पावलामुळे जनतेला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांबद्दल क्षमायाचना केली होती. काही दिवसांसाठी सर्वांना कळ सोसावीच लागेल, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijender Singhविजेंदर सिंगSocial Mediaसोशल मीडिया