शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Corona Virus Vaccine : पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर 'सिरम'च्या आदर पुनावाला यांची 'मोठी' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 20:49 IST

कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित आहे..

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सिरम इन्स्टिटयूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेले होते. या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

सिरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत समाधानी आहे. 

कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही पूनावाला म्हणाले. 

कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित... 

प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लसीमुळे स्वयंसेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शून्य आहे. तसेच लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी कमी झाली आहे असेही यावेळी पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.  

प्रत्यक्ष स्थिती जाणून न घेता सामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण न करण्याचे आवाहन... 

भारतानंतर मुख्यत: ‘कोव्हॅक्स’अंतर्गत असलेल्या आफ्रिकन देशांना लस वितरीत होईल. अ‍ॅस्ट्रॉझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून ब्रिटन आणि युरोपातील देशांचे नियोजन केले जाणार आहे. तर सिरमकडून भारत आणि कोव्हॅक्स देशांना प्राधान्य असेल. स्वस्त दरात आणि मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी, यासाठी संपुर्ण जग भारताकडे डोळे लावून बसले आहे. जगात लागणाऱ्या एकुण लसींपैकी ५० ते ६० टक्के लसी भारतात तयार होतात. आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी ठेवली आहे. जगभरातून लसींच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्व उत्पादक, सरकार आणि माध्यमांनी प्रत्यक्ष स्थिती जाणून न घेता सामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करू नये. सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मनात विनाकारण शंका निर्माण होणे योग्य नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार