शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Corona virus : धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 16:09 IST

Corona virus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे.

ठळक मुद्देपुण्यात शुक्रवारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले. तर, नागपूरात रेमडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना आता या इंजेक्शनची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयातून रेमेडिसीवीर इंजेक्शनचे तब्बल 850 डोस चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. देभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. त्यामुळे, वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे. तर, ऑक्सिजन बेडसह, रेमडिसीवीरचाही तुटवडा जाणवत आहे. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे. पुण्यात शुक्रवारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले. तर, नागपूरात रेमडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातच, आता मध्य प्रदेशच्या भोपाळमधील हमीदी या सरकारी रुग्णालयातून रेमडिसीव्हीरच इंजेक्शनची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. 

हमीदीया रुग्णालयात मुबलक असलेल्या रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा काही दिवसांपूर्वीच आला होता. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडिसीव्हीर इंजेक्शनची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच, चोरट्यांनी रुग्णालयातील रेमेडिसीवीर इंजेक्शनच्या बॉक्सवरच डल्ला मारला आहे. औषध असलेल्या खोलीची खिडकी तोडून हे इंजेक्शन लंपास करण्यात आले आहेत. या चोरट्यांना रुग्णालयातील स्टाफनेच मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी, कोहेफिजा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. राज्यात आत्तापर्यत 42 हजार इंजेक्शनचा पूर्तता झाल्याचं मध्य प्रदेश सरकारने म्हटले आहे. सरकारने 50 इंजेक्शनची ऑर्डर दिली असून 9,788 इंजेक्शनचा पुरवठा आजच करण्यात येणार आहे. उर्वरीत इंजेक्शन पुढील 3 दिवसांत येतील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, रेमडेसीवीर इंजेक्शनची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

मंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप 

राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत म्हंटलय की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhopal-pcभोपाळhospitalहॉस्पिटलThiefचोर