शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Corona Virus: अनेक राज्यांत शाळा, कॉलेज बंद; देशात रुग्णांची संख्या ८१ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 06:37 IST

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, ओडिशा, हरयाणाचा समावेश

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता ८१ वर पोहोचली आहे. कर्नाटकात एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या रुग्णांमध्ये १७ जण विदेशी आहेत. १६ जण इटलीचे नागरिक आहेत. तर, एक जण कॅनडाचा नागरिकआहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, नागरिकांनी कोरोनामुळे घाबरुन जाऊ नये. सात रुग्ण बरे झाले असूनत्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. तर, ७१ रु ग्णांची प्रकृती स्थिर आहे. कलबुर्गी येथील ही व्यक्ती नुकतीच सौदी अरेबियातून आली होती. कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामलु यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. कर्नाटकात ज्या वृद्धाचामृत्यू झाला त्याच्या संपर्कात आलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला वेगळे ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीत सहा रुग्ण तर, उत्तरप्रदेशात १० रुग्ण आढळलेले आहेत. कर्नाटकात ५, महाराष्ट्रात ११ आणि लडाखमध्ये ३ जणांना संसर्ग झाला आहे. राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मिर, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण समोर आला आहे. केरळात आतापर्यंत १७ रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. बंगळुरुतील एका कंपनीतील एका कर्मचाऱ्याला संसर्ग झाला आहे. हा कर्मचारी नुकताच ग्रीसहून परतला होता.

देशात कोरानाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, घाबरुन जाण्याचे कारण नाही. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७५ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रभावी धोरण ठरवूकोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सार्क देशांनी संयुक्तपणे धोरण राबवावे. सार्क देशांनी जगासमोर उदाहरण घालून द्यावे व कोविड-१९ ला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सार्क देशांच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यावी. सार्कचे सदस्य देश श्रीलंका, मालदीव, भूतान आणि नेपाळने या सूचनेचे स्वागत केले. आमच्या देशाच्या नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रभावी धोरण ठरवू शकतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानसरकारला गुंगीकोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मोदी सरकारने ज्या काही हालचाली केल्या त्या पाहता त्याला ‘गुंगी’ आली आहे. जर कठोर उपाययोजना केली गेली नाही तर अर्थव्यवस्था नष्ट होईल. हा आजार ‘फार मोठा प्रश्न’ असून, त्याकडे दुर्लक्ष करणे हा काही उपाय नाही.- राहुल गांधी, काँग्रेस नेतेपुरेशी काळजी घ्याकोरोना व्हायरसचा फैलाव होणार नाही यासाठी लोकांनी पुरेशी काळजी घ्यावी. प्रत्येकाने पुरेसे सावध राहावे व काळजी घ्यावी. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केलेले आहे. - प्रियांका गांधी, काँग्रेसरुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० नागरिकांवर विशेष लक्ष ठेवणारदेशात कोरोना रुग्णांची संख्या ८१ वर पोहोचली असताना अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत अथवा काही आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, ओडिशा या राज्यांनी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ७५ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस