शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

corona virus : मजूरांकडून रेल्वेभाडे नाही घेणार, प्रत्येकी १ हजार रुपये मदत देणार; या राज्याने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 15:07 IST

लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देपरराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहेपरराज्यातून श्रमिक स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कुठल्याही प्रकारचे भाडे वसूल केले जाणार नाहीया सर्व मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत म्हणून दिले जातील

पाटणा - गेल्या दीड महिन्यापासून देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर विविध भागात अडकून पडले होते. दरम्यान, लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच या मजुरांसाठी श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी केंद्र सरकारकडून भाडेवसुली करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पण परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  

‘’परराज्यात अडकलेल्या बिहारी लोकांना परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावाचा विकार केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. परराज्यातून श्रमिक स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कुठल्याही प्रकारचे भाडे वसूल केले जाणार नाही, या मजुरांना सुरुवातीला क्वारेंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर या सर्व मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत म्हणून दिले जातील,’’ असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.  

ही रक्कम बिहार सरकारकडून दिली जाईल. या योजनेंतर्गत बिहार सरकारने १९ लाख मजुरांना याआधीही प्रत्येकी एक हजार रुपये दिले गेले होते. दरम्यान, बाहेरून आलेल्या सर्व प्रवासी मजुरांना २१ दिवसांपर्यंत क्वारेंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल, असे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: …महाराष्ट्र सरकारच्या त्या चुकीमुळे आमच्या अडचणी वाढल्या, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप 

CoronaVirus: सूट मिळताच कोरोनाचा संसर्ग वाढला, तीन दिवसांत आढळले साडेसात हजाराहून अधिक रुग्ण

CoronaVirus News: कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

 

 

बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५०३ रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ददेशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारत