शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

corona virus : मजूरांकडून रेल्वेभाडे नाही घेणार, प्रत्येकी १ हजार रुपये मदत देणार; या राज्याने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 15:07 IST

लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देपरराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहेपरराज्यातून श्रमिक स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कुठल्याही प्रकारचे भाडे वसूल केले जाणार नाहीया सर्व मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत म्हणून दिले जातील

पाटणा - गेल्या दीड महिन्यापासून देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर विविध भागात अडकून पडले होते. दरम्यान, लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच या मजुरांसाठी श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी केंद्र सरकारकडून भाडेवसुली करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पण परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  

‘’परराज्यात अडकलेल्या बिहारी लोकांना परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावाचा विकार केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. परराज्यातून श्रमिक स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कुठल्याही प्रकारचे भाडे वसूल केले जाणार नाही, या मजुरांना सुरुवातीला क्वारेंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर या सर्व मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत म्हणून दिले जातील,’’ असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.  

ही रक्कम बिहार सरकारकडून दिली जाईल. या योजनेंतर्गत बिहार सरकारने १९ लाख मजुरांना याआधीही प्रत्येकी एक हजार रुपये दिले गेले होते. दरम्यान, बाहेरून आलेल्या सर्व प्रवासी मजुरांना २१ दिवसांपर्यंत क्वारेंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल, असे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: …महाराष्ट्र सरकारच्या त्या चुकीमुळे आमच्या अडचणी वाढल्या, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप 

CoronaVirus: सूट मिळताच कोरोनाचा संसर्ग वाढला, तीन दिवसांत आढळले साडेसात हजाराहून अधिक रुग्ण

CoronaVirus News: कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

 

 

बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५०३ रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ददेशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारत