शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:15 IST

Corona Virus : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी होणं ही याची प्रमुख कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणं सौम्य असतात आणि रुग्ण घरीच बरे होत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना खबरदारीची आणि रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक संसाधनांची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे, जिथे मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रसारख्या मोठ्या शहरांमध्येही नवीन रुग्ण वाढत आहेत, ज्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

"परिस्थिती नियंत्रणात, मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक”

NB.1.8.1 आणि LF.7 सारखे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत, परंतु जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारतीय आरोग्य संस्थांनुसार, हे व्हेरिएंट मागील ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर नाहीत. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेलया माहितीनुसार "२०२३ मध्ये दिसणारा नवीन व्हेरिएंट JN.1 आता जागतिक स्तरावर प्रमुख आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे."

कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय

आरोग्य मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्याचा, सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे.  ज्या लोकांनी बराच काळ बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी लस घेण्याचा विचार करावा असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. DGHS, NCDC आणि ICMR सारख्या संस्था सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नवीन व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यासाठी टेस्ट आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, घाबरण्याची गरज नाही, परंतु सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत