शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:01 IST

Coronavirus: गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे.

ठळक मुद्देगायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे. देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गोमूत्र आणि शेणाचे भाव वाढत आहेत.गोमूत्र हे 500 रुपये लीटर तर गायीचे शेण हे 500 रुपये किलो या दरात विकले जात आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे. तर जगभरात कोरोना व्हायरसमुळे 7000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय हे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला होता. त्यानंतर आता गोमूत्र आणि शेणाला अधिक मागणी असल्याची माहिती समोर आली आहे. 

गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे. देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गोमूत्र आणि शेणाचे भाव वाढत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. रिपोर्टनुसार, गोमूत्र हे 500 रुपये लीटर तर गायीचे शेण हे 500 रुपये किलो या दरात विकले जात आहे. काहींनी गोमूत्र आणि शेण विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला दुकाने उभारली आहेत. दिल्ली आणि कोलकाताला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शेण आणि गोमूत्र यांची विक्री केली जात आहे. विक्री करणाऱ्या दुकानदाराने दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीकडून ही कल्पना सुचल्याची माहिती दिली आहे. 

हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीला जमलेल्या काहींनी विमानतळावर दारूबंदी करण्यात यावी आणि त्याजागी गोमूत्र ठेवण्यात यावं, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच ट्रम्प यांनाही गोमूत्र पाठवणार आहोत, अशी माहिती एकाने दिली होती. आम्ही पंतप्रधान मोदींची  भेट घेणार आहोत. ते तर स्वतः गोमूत्र पितात, असा दावाही त्यांनी केला होता. अनुराग कश्यप यांनी काही दिवसांपूर्वी 'अच्छे दिन' या शीर्षकासह हा व्हिडीओ शेअर केला होता. कश्यप यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या होत्या. 

कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशनमध्ये 1, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, ओडिशामध्ये 1, पंजाबमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण 

Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्लीcowगायmilkदूध