शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:23 IST

Coronavirus Cases in India: सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ज्याचं मुख्य कारण JN.1, LF.7 आणि NB.1.8 सारख्या नवीन ओमायक्रॉन सबव्हेरिएंटचा प्रसार हे आहे. 

कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. आशियामध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य तज्ज्ञांनी नवीन उद्रेकाची जास्त भीती नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा ट्रेंड फ्लूसारख्या प्रकरणांमध्ये हंगामी वाढ असल्याचं सांगितलं, ज्यामध्ये बहुतेक सौम्य लक्षणं आहेत. सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ज्याचं मुख्य कारण JN.1, LF.7 आणि NB.1.8 सारख्या नवीन ओमायक्रॉन सबव्हेरिएंटचा प्रसार हे आहे. 

सिंगापूरमध्ये, आठवड्याला कोरोनाचे रुग्ण २८% ने वाढले, एप्रिलच्या अखेरीस ११,१०० असलेली संख्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १४,२०० पर्यंत वाढली. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ३०% ने वाढले. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये व्हायरसशी संबंधित ३१ मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी तज्ज्ञांचा मते, बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. 

देशभरात २५७ एक्टिव्ह रुग्ण

"आशियामध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांमधील बहुतेक प्रकरणं ही सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही" असं नवी दिल्लीतील एम्स येथील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. हर्षल साळवे यांनी आयएएनएसला सांगितलं.  भारतातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. १९ मे रोजी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या आढाव्यात देशभरात २५७ एक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, मात्र अधिकाऱ्यांनी परिस्थिती 'नियंत्रणात' असल्याचं म्हटलं आहे.

कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका

"कोरोना हा एक असा आजार आहे ज्यामध्ये दर काही महिन्यांनी रुग्ण वाढतील. हे अंतर सहा ते नऊ महिन्यांपर्यंत असू शकतं. इतर आशियाई देशांप्रमाणे, भारतातही आपण कोरोनाचे रुग्ण पाहत आहोत. परंतु ते रुग्णालयांमध्ये दाखल झालेले नाहीत आणि पूर्वीपेक्षा जास्त गंभीर नाहीत. बहुतेक रुग्ण इतके सौम्य आहेत की त्यांच्यावर बाह्यरुग्ण म्हणून उपचार केले जात आहेत" असं केरळ राज्य आयएमएच्या संशोधन कक्षाचे संयोजक डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटलं आहे. 

तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

"पूर्वीच्या लसीकरणामुळे आणि मागील संसर्गातून वाचल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आता थोडी मजबूत झाली आहे. कोरोना आता पूर्वीसारखी विनाशकारी शक्ती राहिलेली नाही. बहुतेक संसर्ग सौम्य असले तरी, वृद्ध आणि  आजार असलेल्यांना धोका असल्याचा असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. "जेव्हा रुग्णसंख्या वाढते तेव्हा नेहमीपेक्षा जास्त खबरदारी घेणं महत्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं उपयुक्त ठरेल. ज्यांना ताप आहे त्यांनी घरीच राहावं आणि इतरांशी भेटणं टाळावं" असा सल्ला डॉ. जयदेवन यांनी  दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र