शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : 'कोरोना बिरोना काही नाही, भाजपने तशी परिस्थिती निर्माण केलीय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 19:06 IST

डीके शिवकुमार हे पाण्याचा प्रश्न घेऊन मेकेदातू सर्व्हर प्रोजेक्टसाठी उद्या रविवारपासून तब्बल 168 किमीची पदयात्रा काढत आहेत. मात्र, सध्या राज्यात विकेंड संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

बंगळुरू - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. राजधानी मुंबईतील कोरोना रुग्णांचा दैनिक आकडा 15 हजारांच्यापुढे गेला आहे. त्यामुळे, सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. महाराष्ट्रासह, दिल्ली, प.बंगाल आणि कर्नाटक राज्यातही कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यात, रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमात गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच, कर्नाटकमधीलकाँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. 

डीके शिवकुमार हे पाण्याचा प्रश्न घेऊन मेकेदातू सर्व्हर प्रोजेक्टसाठी उद्या रविवारपासून तब्बल 168 किमीची पदयात्रा काढत आहेत. मात्र, सध्या राज्यात विकेंड संचारबंदी लागू करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. तरीही, डिके शिवकुमार यांनी पदयात्रेचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता. त्यावर, उत्तर देताना देशात कोरोना नाही, असे डीके शिवकुमार यांनी म्हटलंय. 

देशात कोरोना नसून भाजपने हे वातावरण तयार केलंय. कुठंय कोरोना, कोरोना कुठेही नाही. पदयात्रेला थांबविण्यासाठी आणि लोकांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी सरकारनेच कोरोना रुग्णांच्या आकड्यात घोळ केला आहे. त्यातून ही परिस्थिती निर्माण केल्याचा गंभीर आरोप डिके. शिवकुमार यांनी केलाय. बंगळुरू शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील पाण्याच्या समस्येला या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर आणत आहोत. त्यामुळे, सत्ताधारी भाजपला भिती वाटत असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं. संचारबंदी लादत भाजपकडून राजकारण खेळण्यात येत असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे. 

किरीट सोमय्यांचही सरकारवर आरोप

"काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावं. ओमिक्रॉनचे ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरजच पडत नाहीये. २-४ दिवसांत सगळे बरे होत आहेत. खुप कमी लोक कोमॉर्बिटी आहे, त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. घाबरायची गरज नाही," असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

देशात दिवसभरात १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण

कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा भारतात दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट धडकण्याचे संकेत मिळत आहेत. मागील २४ तासांत कोरोनाचे १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी देशात ९० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. भारतात जवळपास ७ महिन्यांनी रुग्णसंख्या १ लाखांच्या वर गेली आहे. त्याआधी ६ जूनला भारतात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाKarnatakकर्नाटक