देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. या आधीच्या आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.
आंध्र प्रदेशात १६, अरुणाचल प्रदेशात ३, आसाममध्ये २, चंदीगडमध्ये १, छत्तीसगडमध्ये ३, दिल्लीत २९४, गोव्यात ७, गुजरातमध्ये २२३, हरियाणामध्ये २०, जम्मू आणि काश्मीरमध्ये ४, कर्नाटकात १४८, केरळमध्ये ११४७, मध्य प्रदेशात १०, महाराष्ट्रात ४२४, मिझोराममध्ये २, ओडिशामध्ये ५, पुद्दुचेरीमध्ये ३५, पंजाबमध्ये ४, राजस्थानमध्ये ५१, तामिळनाडूमध्ये १४८, तेलंगणात ३, उत्तराखंडमध्ये २, उत्तर प्रदेशात ४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतही एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
"कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?
कोणत्या राज्यांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या?
केरळ (+३५५), महाराष्ट्र (+१५३) आणि दिल्ली (+२४) यासह अनेक राज्यांमध्ये एक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय महाराष्ट्र (+४) आणि कर्नाटक (+१) यासह काही ठिकाणी मृतांची संख्याही वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये कोणतेही नवीन रुग्ण किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक ८,२९,८४९ आहे, केरळमध्ये ६,८४,९२७ आणि आंध्र प्रदेशात २,३२,६३५ आहे.
कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका
कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर
कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू?
कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत जास्तीत जास्त मृत्यू महाराष्ट्र (१,४८,६०६), तामिळनाडू (३८,०८६) आणि कर्नाटक (४०,४१२). १९ मे नंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचे नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश (४), छत्तीसगड (१), गोवा (१), गुजरात (७६), हरियाणा (८), कर्नाटक (३४), मध्य प्रदेश (२), राजस्थान (११), तामिळनाडू (३) आणि तेलंगणा (१) यांचा समावेश आहे.