शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 9:54 AM

देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीच मोठ्या शहरात रोजगारासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी आलेल्या नागरिकांनी आपला गाव गाठायला सुरुवात केली होती. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटापासून वाचायचं असेल तर, गाव हेच सर्वात सुरक्षित ठिकाण नागरिकांना वाटू लागले. त्यामुळेच, मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु या हायटेक सिटीतून नागरिकांना, गड्या आपला गावच बरा.. असे म्हणत गावाची वाट पकडली. देशात गेल्या ४० दिवसांपासून लॉकडाऊन सुरु असून ते १७ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. 

देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे. यांसंदर्भात सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च यांचा एक अहवाल समोर येत आहे. त्यानुसार, शहरातील लोकसंख्या ११ टक्क्यांनी कमी झाली असून गावातील लोकसंख्या ७ टक्क्यांनी वाढली आहे. लॉकाडाऊनमुळे सध्या शहरात कुणीही येत नाही.

सीपीआर चे वरिष्ठ विद्यार्थी आणि स्टी के चे सहायक लेखल पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे लाखों लोक आता शहरांकडे येत नाहीत. त्यामुळेच, शहरांजवळी ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढली आहे. पश्चिमी राजस्थान, ओडिशाजवळ हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मजूरांचे गावाकडे पलायन हे याचे मुख्य कारण असल्याचे समजते. दक्षिण भारतातील बंगळुरु, चेन्नई आणि मदुरै या मोठ्या शहरांमध्ये हाच परिणाम दिसून येत आहे. 

Coronavirus: इतर कुठलीही प्रवासी रेल्वे सुरू होणार नाही, रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

देशात मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जास्त लोकसंख्या दिसून येत नाही. या राज्यातून मोठ्या प्रमाणात लोकं दुसऱ्या राज्यात कामाच्या शोधात जातात. मात्र, रेल्वे सेवा बंद असल्याने आणि आंतरराज्य वाहतूक बंद केल्याने ते अडकून पडले आहेत. दरम्यान, ही आकडेवारी गुगलच्या मोबॅलिटी अहवालानुसार ज्या नागरिकांनी आपली लोकेशन हिस्ट्री ऑन ठेवली आहे, त्या नागरिकांची या सर्वेक्षणात गणना झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMigrationस्थलांतरणBengaluruबेंगळूरMumbaiमुंबई