शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली, झाला मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,30,27,621 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,948 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,752 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

हरियाणाच्या एका गावातील 46 वर्षीय महिलेने कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर अचानक महिलेची प्रकृती बिघडू लागली. यानंतर आता 11 दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोग्य विभागाने कुटुंबीयांनी केलेले गंभीर आरोप नाकारले असून कोरोना लस घेतल्याने मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. महिलेची कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. 

महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मांडी खुर्दा या गावात 24 ऑगस्ट रोजी उषा यांनी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर महिलेला ताप येऊ लागला. उषा यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याचं त्यांच्या पतीने म्हटलं आहे. त्यांनी अनेकदा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पण उषा यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. अशातच शनिवारी त्यांची प्रकृती आणखीच ढासळली. उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उषा याआधी कधीच आजारी नव्हत्या. लस घेतल्याने त्या आजारी पडल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच वृद्धाचा मृत्यू; रांग सोडून लोकांनी ठोकली धूम

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूची माहिती मिळताच लसीसाठी रांगेत उभे असलेले लोक घाबरले आणि रांग सोडून घरी पळून गेले. महाराजगंजमधील लसीकरण केंद्रावर ही घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतDeathमृत्यू