शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली, झाला मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,30,27,621 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,948 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,752 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

हरियाणाच्या एका गावातील 46 वर्षीय महिलेने कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर अचानक महिलेची प्रकृती बिघडू लागली. यानंतर आता 11 दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोग्य विभागाने कुटुंबीयांनी केलेले गंभीर आरोप नाकारले असून कोरोना लस घेतल्याने मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. महिलेची कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. 

महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मांडी खुर्दा या गावात 24 ऑगस्ट रोजी उषा यांनी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर महिलेला ताप येऊ लागला. उषा यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याचं त्यांच्या पतीने म्हटलं आहे. त्यांनी अनेकदा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पण उषा यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. अशातच शनिवारी त्यांची प्रकृती आणखीच ढासळली. उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उषा याआधी कधीच आजारी नव्हत्या. लस घेतल्याने त्या आजारी पडल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच वृद्धाचा मृत्यू; रांग सोडून लोकांनी ठोकली धूम

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूची माहिती मिळताच लसीसाठी रांगेत उभे असलेले लोक घाबरले आणि रांग सोडून घरी पळून गेले. महाराजगंजमधील लसीकरण केंद्रावर ही घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतDeathमृत्यू