शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

Corona vaccine: भारतीयांना दिले त्यापेक्षा अधिक डाेस परदेशात पाठविले; सरकारची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 7:10 AM

संयुक्त राष्ट्र : ७० हून अधिक देशांना पुरविली लस

संयुक्त राष्ट्र/नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना काेराेना लसींचे जेवढे डाेस दिले त्यापेक्षा अधिक डाेस इतर देशांना पुरविल्याची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिली आहे. लस पुरवठ्यातील असमानता कोराेना महामारीला राेखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पराभूत करेल, असा इशाराही भारताने दिला आहे. या असमानतेमुळे गरीब देशांवर सर्वात विपरीत परिणाम हाेतील, असे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांत भारताच्या राजदूतांचे उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी भारताच्या भूमिकेबाबत माहिती देताना सांगितले की, लसींच्या आव्हानावर ताेडगा निघाला आहे. आता लसींची उपलब्धता आणि पुरवठ्याचे आव्हान समाेर आहे. जागतिक पातळीवर सहकार्याचा अभाव आणि असमानतेचा गरीब देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा स्थितीतही भारत सहा महिन्यांमध्ये ३० काेटी आघाडीच्या काेराेना याेद्ध्यांचे लसीकरण करणार आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान ७० हून अधिक देशांना काेराेनाची लस पुरविली आहे. देशातील लसीकरणापेक्षा जास्त डाेस इतर देशांना पुरविल्याचे नायडू यांनी सांगितले. 

लस डिप्लाेमसीवरून टीकासरकारने लसींच्या निर्यातीपेक्षा भारतीय नागरिकांना प्राधान्य देऊन लसीकरण केले असते तर काेराेनाची दुसरी लाट राेखता आली असती, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा माेहम्मद यांनी केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या मुद्द्यावरून टीका केली आहे. या मुत्सद्दीपणाची भारताला किंमत माेजावी लागली असून, देशात कराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी या डाेसची मदत झाली हाेती, असे अब्दुल्ला म्हणाले. 

‘काेवॅक्स’ केंद्राला दाेन काेटी डाेसभारताकडून ‘गावी’ देशांच्या ‘काेवॅक्स’ केंद्राला लसीचे दाेन काेटी डाेस पुरविण्यात आले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता माेहिमांसाठी २ लाख काेराेना लसींचे डाेस पाठविण्यात आले आहेत. भारताच्या या पुढाकाराचे संयुक्त राष्ट्रांकडून आभार मानण्यात आले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस