शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

By बाळकृष्ण परब | Updated: February 13, 2021 08:33 IST

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र आता कॅनडाचे सूर बदलले आहेत.

ठळक मुद्देकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भारत सरकारने केलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहेकोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर कोरोनावरील लसीची गरज भासल्यावर कॅनडाचे सूर बदलू लागले आहेतकॅनडा सरकार कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र भारताने परखड प्रतिक्रिया दिल्यानंतर तसेच कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर कोरोनावरील लसीची (Corona vaccine) गरज भासल्यावर कॅनडाचे सूर बदलू लागले आहेत. भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीमुळे गुरुवारी कॅनडाच्या पंतप्रधानांनी जस्टिन ट्रुडो (justin trudeau) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi)कौतुक केले होते. तसेच कॅनडाला भासणाऱ्या लसीच्या गरजेबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना दिली होती.दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी आज शेतकरी आंदोलनाबाबतही भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत कौतुक केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भारत सरकारने केलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले की, त्यांचे सरकार कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे.कोरोनावरील लसीबाबत कॅनडाकडून मदत मागण्यात आली होती. त्यावर भारताने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फोन करून कोरोनावरील लसीबाबत चर्चा केली होती. मोदींकडून लसीबाबत मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याशिवाय दोन्ही नेत्यांनी हवामानातील बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली होती.याबाबत जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांसाठी दोन्ही देशांची कटिबद्धता, हल्लीच झालेली आंदोलने आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या महत्त्वावर चर्चा झाली. तसेच आम्ही यापुढेही संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली, असे ट्रुडो यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCanadaकॅनडाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन