शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:00 IST

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली.

थिरूवनंतपूरम : देशात गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ४६,१६४ रुग्णांची नोंद झाली तर ६०७ जणांचा मृत्यू झाला. देशात रोज २० हजार रुग्णांची वाढ होत असून त्याचे कारण काही राज्यांत विशेषत: केरळमध्ये कोविड-१९ ने घेतलेली उसळी हे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्ण संख्या होती. रुग्णसंख्येचासर्वाधिक फटका एर्नाकुलम (४,०४८ रुग्ण) आणि थ्रिसूर (३,८६५ रुग्ण) जिल्ह्याला बसला. 

सणासुदीत काळजी घ्या : केंद्राचे आवाहन “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल, राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.सणासुदीच्या दिवसांत राज्यांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे कठोरपालन करून घ्यावे, असे राज्यांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.केरळमध्ये सिरोचा प्रभाव फारच कमी झाल्यापासून आम्हाला लवकरात लवकर बाधित झालेले शोधून त्यांना विलगीकरणात ठेवायचे आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या.

ओणमनंतर वाढकेरळमध्ये चाचण्या सकारात्मक निघण्याचा दर १९.०३ टक्के असून तो गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. या वाढीला कारण ठरला तो गेल्या आठवड्यात साजरा झालेला ओणम सण. ओणमनंतर रुग्णसंख्या वाढेल अशी राज्याची अपेक्षा आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढवण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ