शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

Coronavirus: कोरोना काळात मुलीचं लग्न बनलं वडिलांच्या मृत्यूचं कारण; दंडाची रक्कम पाहून शेतकरी पित्याने प्राण सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 3:12 PM

या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देअडीला गावात एका लग्न समारंभात कोविड १९ नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी असलेल्या वधू पित्याला जमीन गहाण ठेऊन रक्कम भरावी लागलीपतीची तब्येत बिघडली त्यांच्या उपचारासाठीही आमच्याकडे पैसे शिल्लक नव्हते.

जयपूर – राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात कोरोना काळात लग्नावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. यातील निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने एका वधुपित्यावर दंड आकारण्यात आला. त्यामुळे या कारवाईचा धसका घेऊन वधूच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाकडून दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्याची जमीन गहान ठेवावी लागली आणि पैसे जमा करावे लागले. मात्र ३ दिवसानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार, कापरेन नगरपालिकेच्या परिसरात येणाऱ्या अडीला गावात एका लग्न समारंभात कोविड १९ नियमांचे उल्लंघन झालं. त्यामुळे प्रशासनाकडून वधू पित्याला १ लाखांचा दंड ठोठावला. त्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी असलेल्या वधू पित्याला जमीन गहाण ठेऊन रक्कम भरावी लागली. मात्र या कारवाईचा धसका घेतल्याने त्यांचा २० मे रोजी मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली  

मृतकाच्या पत्नी आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मृतकाची पत्नी बृजमोहन मीणा म्हणाल्या की, १४ मे २०२१ रोजी माझ्या लहान मुलीचं लग्न कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होत होतं. त्यात कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करण्यात आलं. सर्व व्यक्ती मास्क आणि सोशल डिस्टेसिंगचं पालन करत होते. त्यासह लग्न समारंभात मर्यादित संख्या होती असं त्यांचे म्हणणं आहे.

त्याचवेळी कुटुंबातील ७ लोक जेवण करत होते. तेव्हा काही अधिकारी आमच्या घरी पोहचले. तेव्हा त्यांच्या येण्याने गावकरीही जमले. या गर्दीचा व्हिडीओ बनवून अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि त्याचसोबत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. माझ्या पतीची तब्येत आधीच खराब होती. त्यात या प्रकारामुळे तब्येत आणखी बिघडली. प्रशासनाकडून दंड भरण्यासाठी दबाव येत होता. आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशावेळी जमीन गहाण ठेऊन आम्ही दंडाची रक्कम भरली होती असं पत्नी म्हणाली.

त्यानंतर पतीची तब्येत बिघडली त्यांच्या उपचारासाठीही आमच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. त्यात २० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीमुळे आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंबाने निवेदनात केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या