शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक? पुन्हा व्हॅक्सीन घेण्याची गरज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 21:43 IST

भारतात कोरोनाचा नवीन JN.1 व्हेरिएंट आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

Corona New Varient: कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट(JN.1) आल्याने चिंता वाढली आहे. तज्ज्ञांची टीम या नवीन व्हेरिएंटवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हेरिअंटमुळे देशात आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सोमवारी हेल्थ अ‍ॅडव्हायजरी जारी केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, JN.1 व्हेरिएंट कोरोनाच्या BA.2.86 चे अपडेटेड व्हर्जन आहे.

दरम्यान, लसीचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेऊनही कोव्हिडचा हा नवीन व्हेरिएंट हल्ला करू शकतो का? लसीचा आणखी एक डोस घ्यावा लागेल  का? मास्क वापरणे पुरेसे ठरेल का? असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले आहेत. कोरोना काळात कोव्हिड प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या टीमचे सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, “हा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचाच एक व्हेरिएंट असल्याचे समोर आले आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमुळे विषाणू किती धोकादायक आहे, हे कळते. ओमायक्रॉन भारतात फार धोकादायक असल्याचे सिद्ध झालेले नाही. 

कोरोनादरम्यान दिल्लीतील सर्वात मोठ्या कोव्हिड रुग्णालयांपैकी एक असलेल्या एलएनजेपीच्या पल्मोनरी विभागाचे एचओडी डॉ. नरेश कुमार सांगतात की, "सध्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळणारा विषाणू सामान्य विषाणू आहेत. पॅरायन्फ्लुएंझा विषाणू आणि रायनोव्हायरस या मोसमात आढळतात. या विषाणूला फार घाबरण्याची गरज नाही, पण तशी परिस्थिती उद्धभवली, तर यंत्रणा तयार असेल."

WHO काय म्हणाले?डब्ल्यूएचओच्या मते या व्हेरिएंटच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. जीवितहानी होण्याचा धोकाही कमी असतो. रुग्णांना तीन ते पाच दिवस सामान्य ताप आणि सर्दीसारखी लक्षणे जाणवू शकतात. कोरोनाची लस प्रत्येक व्हेरिएंटसाठी प्रभावी ठरली आहे. काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त डोस वापरण्याचा सल्ला दिला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR सह अनेक एजन्सी आणि तज्ञांची टीम यात गुंतलेली आहे. सध्या, यासाठी कोरोना लसीचे अतिरिक्त डोस देण्याची गरज नाही. 

नव्या व्हेरिअंटने 5 जणांचा मृत्यूआरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 1828 आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. मृतांमध्ये 4 जण केरळ, तर 1 उत्तर प्रदेशातील आहे. तसेच, देशातील मृत्यू दर 1.19 टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे 335 नवे रुग्ण डिटेक्ट झाले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या