शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:57 IST

China Coronavirus : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत

ठळक मुद्देभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरससाठी ही नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश.पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचाराच्या खर्चाचा देखील समावेश असेल.

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांतही कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 3,286 वर पोहोचली आहे तसेच 95,484 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे. पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरससाठी ही नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जगभरात हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळेच या नवीन पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचाराच्या खर्चाचा देखील समावेश असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 झाली असून, परदेशात राहणाऱ्या 18 भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केलं आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. परदेशात व भारतात लोक एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करतात. पण परदेशात लोक हस्तांदोलन टाळत आहेत. पण आता भारतीय संस्कृतीतील नमस्काराची पद्धत तिथे रूढ होत आहे. अनेक देशांतील लोकांनी मांसाहार बंद केला असून, ते शाकाहाराकडे वळत आहेत.  

कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी जगातील सर्व देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. 3 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. फेसबुक, ट्विटर आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सूचना केली आहे. कर्नाटक सरकारने कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्नाटक सरकारने बेंगळूरमधील सर्व कंपन्यांना सूचना केली आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली तर त्याला घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच लोकांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले जात आहे कर्नाटक सरकारने यासाठी परिपत्रक जारी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका

कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती

 

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत