शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

Corona in India: कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले? केंद्र सरकारने संसदेत दिले 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:00 IST

'जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. सरकारने संसदेत आकडेवारी सांगावी.'

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात गंगा नदीत फेकलेल्या मृतदेहांवरुन वाद पुन्हा चिघळला आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी विचारले की, कोरोना काळात गंगा नदीत किती मृतदेह फेकण्यात आले? त्यावर जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी लेखी उत्तर दिले. कोविड-19 संबंधित मृतदेह गंगा नदीत फेकल्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये अज्ञात मृतदेह गंगेत वाहून गेल्याच्या घटना प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. जलशक्ती मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारांकडून गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचा अहवाल मागवला होता.

जलशक्ती राज्यमंत्र्यांच्या या लेखी उत्तरावरुन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने जलशक्ती राज्यमंत्र्यांवर खोटी तथ्ये संसदेत मांडल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार शुभेंदू शेखर राय यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सरकार खोटे बोलत आहे. सरकार वस्तुस्थिती लपवत आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. गंगेत किती मृतदेह फेकले, हे सरकारने संसदेत सांगावे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संसदेचा अपमान आहे.

दुसरीकडे, सरकारकडे यापेक्षा असंवेदनशील आणि असभ्य उत्तर असू शकत नाही, असं आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, सरकार संसदेत वारंवार आकडे लपवत आहे. गेल्या सत्रात केसी वेणुगोपाल यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्र्यांनी सरकारकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणी केसी वेणुगोपाल यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना विशेषाधिकार भंगाची नोटीसही दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारtmcठाणे महापालिका