शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 5:46 AM

पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेशात जोमाने रुग्णवाढ

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशभरात कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड संख्येने वाढ झाली. १ एप्रिल रोजी देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार होता. तो ३० एप्रिल रोजी ४ लाख एवढा झाला. या सगळ्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ज्या राज्यांमध्ये निवडणूक होती त्या राज्यांत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग आसाममध्ये होता. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली, तर उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांसाठी प्रचार झाला. या कालावधीत या सर्व राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जोमाने वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. आसाममध्ये १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ५८ होती. ३० एप्रिल रोजी ही संख्या ३,१९७ एवढी झाली. याचाच अर्थ एकट्या आसामात एक महिन्यात तब्बल ५४१२ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. याच कालावधीत पश्चिम बंगालमध्ये १२६६ टक्के, केरळ आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे १२२९ आणि १२२७ टक्के, तर तामि‌ळनाडू आणि पुदुच्चेरीत अनुक्रमे ५६३ आणि ३५९ टक्के रुग्णवाढीची नोंद झाली. 

कर्नाटक आणि गुजरात या भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कर्नाटक तर आता कोरोनाची राजधानी म्हणून उदयाला येऊ लागले आहे. 

कर्नाटकात १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ४,२३४ एवढी होती. ती ३० एप्रिल रोजी ४८,२९६ एवढी झाली.

गुजरातमध्येही याच कालावधी ५०६ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. दिल्लीतही ९९१% रुग्णवाढ झाली आहे.

कोरोनाची बाधा झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत तीन हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगाल