शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

"राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा शेवट सुरू होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 3:49 PM

राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होताच कोरोना संकट दूर होईल; भाजपा नेत्याला विश्वास

भोपाळ: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल दिवसभरात देशात तब्बल ४५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा साडे बारा लाखांच्या जवळ पोहोचला. तर कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातच कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी येणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केल्यानं संकट आणखी गहिरं झालं आहे. कोरोनावरील लस येण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.एका बाजूला संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असताना, त्यांच्या चाचण्यांसाठी अविरत प्रयत्न करत असताना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वेगळाच दावा केला आहे. अयोध्येत राम मंदिरासाठी (Ram Mandir Ayodhya) भूमिपूजन झालं, मंदिराच्या कामाला सुरुवात झाली की कोरोनाचा शेवट सुरू होईल, असं मध्य प्रदेश विधानसभा उपाध्यक्ष आणि भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे.'दानवांचा खात्मा करण्यासाठी आणि माणसांच्या कल्याणासाठी प्रभू रामांनी वेळोवेळी पुनर्जन्म घेतले आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा खात्मा सुरू होईल,' असा विश्वास शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. 'भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. आपण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. याशिवाय आपल्या देवांचंही स्मरण करत आहोत,' असं ते पुढे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. श्रीराम जन्मभूमी विश्वस्त मंडळाचे खजिनदार स्वामी गोविंदगिरी यांनी ही माहिती दिली. या सोहळ्यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करण्यात येईल. कार्यक्रमाला २०० पेक्षा जास्त जण उपस्थित नसतील, असंदेखील त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी हनुमान गढी, राम लल्लांच्या मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते वृक्षारोपण करतील. मग भूमिपूजन होईल, अशी माहिती त्यांनी दिली."छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता""छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी