शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लोकांची संमती न घेतल्याने ‘सीएए’मुळे घटनात्मक संकट- अ‍ॅड. भीमराव आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 2:14 AM

भाजप सरकारचे निर्णय अपयशी

जळगाव : संपूर्ण देशाशी निगडीत एखादा मोठा मुद्दा जेव्हा हाताळला जातो, त्यावेळी लोकांची संमती घेणे अत्यंत आवश्यक असते. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्यावेळी लोकांची संमती घेणे गरजेचे होते़ नेमके तेच सरकारने केले नाही व त्यामुळे आज घटनात्मक संकट उभे राहिले आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ‍ॅड़ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़रविवारी आयोजित बौद्ध परिषदेसाठी ते जळगावात आले होते. अनेक राज्यांनी आज हे कायदे लागू न करण्याचा ठराव केला आहे़ मतदारांची मते जाणून घेतली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती़ सरकारने या कायद्याबाबत संसदेला पटवून सांगितले, मात्र, या कायद्याची नेमकी गरज काय? त्याची फलनिष्पत्ती काय? हे लोकांना समजावून सांगणे गरजेचे होते़ भाजप सरकारचे या आधीचेही निर्णय अपयशी ठरले आहेत़ नोटबंदी हा निर्णय पूर्णत: अपयशी ठरला आहे़ काळा पैसा आलाच नाही, बेराजगारी प्रचंड वाढली आहे़ संविधान सादर करताना भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, सरकारने भारतीयत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता मात्र, सर्वत्र दुहीचे वातावरण दिसते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली़आंबेडकरी चळवळीला चांगले भवितव्यआंबेडकरी चळवळीकडे केवळ राजकीय नेतृत्व म्हणून बघून तिला मर्यादित करू नका. आज शैक्षणिक, आर्थिक सामाजिक दृष्ट्या समाजाचा स्तर उंचावला आहे़ आंबेडकरी चळवळीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असेही त्यांनी सांगितले़ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेत चांगली मते मिळाली. अनेक ठिकाणी ते दुसऱ्या क्रमांकावर होते, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक