शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
4
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
5
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
7
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
8
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
9
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
10
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
11
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
12
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
13
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
14
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
15
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
16
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
17
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
18
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
19
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
20
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भगव्याचा संबंध संघाशी जोडणे पूर्णत: चुकीचे

By admin | Updated: June 20, 2015 10:24 IST

कोणताही लेखक त्याच्या लिखाणापायी तयार झालेल्या त्याच्या शत्रूंमुळे ओळखला जातो. माझ्या दिल्लीतल्या मित्राने जेव्हा मला हे सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे

- रामचन्द्र गुहा(इतिहासकार आणि स्तंभलेखक)

कोणताही लेखक त्याच्या लिखाणापायी तयार झालेल्या त्याच्या शत्रूंमुळे ओळखला जातो. माझ्या दिल्लीतल्या मित्राने जेव्हा मला हे सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द आॅर्गनायझर’ मधल्या अग्रलेखात मला लक्ष्य करण्यात आले आहे, तेव्हा माझी उत्सुकता ताणली गेली. मी इंटरनेटवरून तो अग्रलेख शोधून काढला. त्यात असा आरोप करण्यात आला होता की, ‘रामचंद्र गुहा आणि रोमिला थापर हे दोघेही शिक्षणाच्या भारतीयिकरणाला भगवेकरण संबोधून त्याची टिंगल करीत आहेत. त्यांच्या या द्वेषमूलक मानसिकतेकडे दुर्लक्ष करीत आपण भारतीय तथ्यांवर आधारीत शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे’. हे वाचून मी अस्वस्थ झालो. भगवेकरण या संकल्पनेची अवहेलना करण्यात माझा कुठेही सहभाग नव्हता. संघ परिवाराच्या विचारांचा उल्लेख भगवा असा होणार नाही याची, खरे तर काळजी घेत असतो. दिवंगत यू.आर. अनंतमूर्ती यांच्या प्रमाणेच माझेही असे मत आहे की, भगवा या सुंदर रंगाचा संबंध शुद्धता आणि भारतीय इतिहासातील त्यागाशी आहे. त्यामुळे या रंगाचा संघाशी संबंध जोडण्याची माझी इच्छा नाही. आॅर्गनायझरचा हा अग्रलेख पुढे म्हणतो की, ‘शिक्षणाच्या भारतीयिकरणाचा आधार इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुळांमध्ये आहे आणि भारताला मानव विकास केंद्रात परावर्तीत करण्यासाठी हा एकच मार्ग आहे’. शिक्षणाचे भारतीयिकरण म्हणजे नेमके काय? शिवराम कारंथ एकदा म्हणाले होते की ‘भारतीय संस्कृतीवर बोलणे अशक्य आहे, कारण तो फार मोठा विषय आहे. आजची भारतीय संस्कृती इतक्या विविधतेने भरलेली आहे की त्या विविधतेलाही अनेक संस्कृत्या म्हणावे लागेल’. या संस्कृतीचे मूळ प्राचीन काळात जाते आणि ही संस्कृती अनेक वंश आणि लोकसमूहांशी संपर्क साधत विकसीत झाली आहे. म्हणूनच तिच्या अनेक घटकांकडे बघितले तर इथले कोण आणि बाहेरचे कोण तसेच या संस्कृतीने प्रेमाने काय मिळवले आणि बळजबरीने काय लादले हे सांगणे कठीण होऊन जाते. जगाच्या पाठीवरील प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या नजरेनेच पाहिले पाहिजे, असा संघाचा दृष्टीकोन आहे. आॅर्गनायझरच्या या अग्रलेखातही ‘अ‍ॅन्ग्लोसॅक्सन’ (प्राचीन इंग्रजी संस्कृती) मूल्यांवर हल्ला चढवून ही मूल्ये आपल्या संस्कृतीशी विसंगत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात कारंथ यांनी दिलेला इशारा विचारात घेण्यासारखा आहे. १९०८ साली प्रकाशित झालेल्या एका निबंधात रवीन्द्रनाथ टागोरांनी असे निरीक्षण नोंदवले होते की, ‘जर भारत पाश्चात्य जगापासून दूर राहिला असेल तर त्याने आता परिपूर्णतेसाठी पुढे आले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी तीन हजार वर्षापूर्वी जगाकडून जे घेण्यासारखे होते तेही बंद केले होते. वास्तवात जगाकडून घेण्यासारखेही खूप काही आहे’. टागोरांच्या नंतरच्या काळात जग खूपच जवळ आले आहे. भारताने आता युरोप, चीन, जपान, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेसोबत आणखी प्रभावी संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. आदानप्रदानातून आपण खूप काही चांगलं मिळवू शकतो व तेही आपल्याकडून काही प्राप्त करु शकतात. त्यासाठी ज्ञानाच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. भारतातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगाकडे बघण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच इथल्या मूल्यांकडे बघण्याचे मार्गदर्शन केले पाहिजे. आॅर्गनायझरच्या लेखाशी या बाबतीत मात्र मी सहमत आहे. पण इथल्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांबाबत माझी भूमिका जरा वेगळी आहे. शालेय अभ्यासक्रम स्थानिक वा प्रादेशिक परिस्थितीशी मिळतेजुळते ठेवणे हाच माझ्या मते शिक्षणाचे भारतीयिकरण करण्याचा रचनात्मक मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर जाऊन स्थानिक वन्यजीव, वनस्पती, जलस्त्रोत, कृषी, वने आदिंची माहिती घेतली पाहिजे व त्यांनी स्थानिक वास्तू वारसा, मंदीर, मशीद , चर्च, गुरुद्वारे आणि किल्ले यांचीही नोंद ठेवली पाहिजे. येथील विविधतेने नटलेल्या संस्कृती आणि निसर्गाविषयी जाणून घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांनी राजकीय चौकटीतून बाहेर येणे गरजेचे आहे. संघ पूर्वीपासून हेच सांगत आला आहे की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या कलानेच आधुनिक भारताचे नियोजन आणि निर्माण होत आले आहे. आता मात्र संघ कॉंग्रेसची आधुनिक भारताची संकल्पना बाजूला सारुन त्याला आदर्शवत असलेल्या वि.दा.सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या संकल्पनेतला भारत साकारण्याची संधी शोधत घातक पावले उचलीत आहे. काही विचारवंतांनी भारतीय संस्कृतीला एकसंध म्हणताना, त्यात हिंदुत्व शोधून काढले आहे व हीच बाब संघाच्या सोयीची आणि पथ्यकर ठरल्याने संघाचे काही अनुयायी देशात हिंदुत्व अमलात आणण्यासाठी उत्सुक झाले आहेत. सुदैवाने, भारतातील राजकीय विचारांचा प्रवाह भाजपा किंवा कॉंग्रेसच्या विचारांपेक्षा खूपच विशाल आणि विस्तृत आहे. अलीकडेच आयआयटी मद्रास मधील काही विद्यार्थ्यांच्या आंबेडकर-पेरियार अभ्यास मंडळावर घातलेल्या बंदी वरून एक वाद उफाळून आला होता. हे अभ्यास मंडळ आंबेडकर आणि पेरियार यांचे नाव घेत घेऊन काम करीत होते म्हणूनच त्यावर बंदी आली, हे उघड आहे. या दोन्ही विचारवंतांनी पाश्चात्य देशातली मूल्ये उचलून धरली होती आणि केवळ हिन्दुत्वाच्या आधारावर भारतीय संस्कृतीला संंकुचित करण्यास विरोध केला होता. विख्यात समाजशास्त्रज्ञ मेक्स वेबर यांच्या मताप्रमाणेच माझाही असा ठाम विश्वास आहे की ‘विद्यापीठे ही विद्यार्थ्यांवर मते लादणारी यंत्रणा होण्यापासून आणि एका विशिष्ट राजकीय किंवा धार्मिक विचारांची प्रचार-केंद्रे होण्यापासून रोखली गेली पाहिजेत’. हा बहुजनवाद कदाचित सांस्कृतिक वर्चस्ववाद्यांच्या किंवा कोणे एकेकाळी विद्यापीठातील शिक्षणावर प्रभाव पाडणाऱ्या डाव्यांच्या आणि आता त्यांची जागा घेऊ पाहणाऱ्या उजव्यांच्या विरोधातही असू शकेल.