शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:48 IST

Madhya Pradesh Opinion Poll: मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनेभाजपाला चारीमुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवला होता. आता यावर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशसह इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यात भाजपा बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

झी न्यूज या वृत्तवाहिनीसाठी हा ओपिनियन पोल MATRIZE ने केला आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला ४५ तर काँग्रेसला ३९ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये १६ टक्के मते जातील. तर या मतांचं जागांमध्ये परिवर्तन केल्यास भाजपाला ११९ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ९४ ते १०४ जागा मिळतील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये ४ ते ९ जागा जातील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.

या ओपिनियन पोलमध्ये मध्य प्रदेशची पाच विभागात विभागणी करून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या चंबळ विभागात विधानसभेच्या ३४ जागा आहेत. त्यापैकी भाजपाला १५ ते २० आणि काँग्रेसला १२ ते १७ जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात १ ते २ जागा जातील. 

महाकौशल विभागामध्ये ४९ जागा असून, त्यातील २३ ते २८ जागा भाजपाला मिळतील तर २० ते २५ जागा काँग्रेस जिंकेल, असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर इतरांना या विभागात ० ते १ जागा मिळेल, असे म्हटले आहे. 

माळवा विभागामध्ये २८ जागा आहेत. त्यात भाजपा ११ ते १५ जागा जिंकेल. तर काँग्रेसला १२ ते १७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माळवा उत्तर या विभागात ६३ जागा आहेत. येथे भाजपाला ३२ ते ३७  आणि काँग्रेसला २४ ते २९ जागा मिळतील, तर इतरांच्या खात्यामध्ये २ जागा जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विंध्य विभागात ५६ जागा आहेत. येथे भाजपाला ३१ ते ३६ तर काँग्रेसला १९ ते २४ जागा मिळतील. इतरांच्या खात्यामध्ये १ ते ३ जागा जातील, अशा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री म्हणून सर्व्हेमध्ये मध्य प्रदेशमधील ३६ टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर २३ टक्के लोकांनी कमलनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. दिग्विजय सिंह यांना ६ टक्के लोकांनी तर ज्योतिरादित्य शिंदे यांना १० टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली आहे. जितू पटवारी यांना ९ टक्के तर नरोत्तम मिश्रा यांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक