शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:48 IST

Madhya Pradesh Opinion Poll: मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनेभाजपाला चारीमुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवला होता. आता यावर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशसह इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यात भाजपा बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

झी न्यूज या वृत्तवाहिनीसाठी हा ओपिनियन पोल MATRIZE ने केला आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला ४५ तर काँग्रेसला ३९ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये १६ टक्के मते जातील. तर या मतांचं जागांमध्ये परिवर्तन केल्यास भाजपाला ११९ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ९४ ते १०४ जागा मिळतील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये ४ ते ९ जागा जातील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.

या ओपिनियन पोलमध्ये मध्य प्रदेशची पाच विभागात विभागणी करून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या चंबळ विभागात विधानसभेच्या ३४ जागा आहेत. त्यापैकी भाजपाला १५ ते २० आणि काँग्रेसला १२ ते १७ जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात १ ते २ जागा जातील. 

महाकौशल विभागामध्ये ४९ जागा असून, त्यातील २३ ते २८ जागा भाजपाला मिळतील तर २० ते २५ जागा काँग्रेस जिंकेल, असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर इतरांना या विभागात ० ते १ जागा मिळेल, असे म्हटले आहे. 

माळवा विभागामध्ये २८ जागा आहेत. त्यात भाजपा ११ ते १५ जागा जिंकेल. तर काँग्रेसला १२ ते १७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माळवा उत्तर या विभागात ६३ जागा आहेत. येथे भाजपाला ३२ ते ३७  आणि काँग्रेसला २४ ते २९ जागा मिळतील, तर इतरांच्या खात्यामध्ये २ जागा जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विंध्य विभागात ५६ जागा आहेत. येथे भाजपाला ३१ ते ३६ तर काँग्रेसला १९ ते २४ जागा मिळतील. इतरांच्या खात्यामध्ये १ ते ३ जागा जातील, अशा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री म्हणून सर्व्हेमध्ये मध्य प्रदेशमधील ३६ टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर २३ टक्के लोकांनी कमलनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. दिग्विजय सिंह यांना ६ टक्के लोकांनी तर ज्योतिरादित्य शिंदे यांना १० टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली आहे. जितू पटवारी यांना ९ टक्के तर नरोत्तम मिश्रा यांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक