शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 19:34 IST

लखनऊमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधींचा रोड शो

लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीउत्तर प्रदेशकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेला उत्तर प्रदेश सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतो. दिल्लीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जात असल्यानं राहुल यांनी या राज्याची जबाबदारी बहिण प्रियंका आणि तरुण खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवली. यानंतर आज काँग्रेसनं लखनऊमध्ये मोठा रोड शो केला. यामध्ये राहुल गांधींसहप्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यासाठी आधी उत्तर प्रदेश काबीज करा, असा स्पष्ट संदेश प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना राहुल यांनी दिला. याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या. काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी लखनऊमधील रोड शोनंतर पक्ष कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत करण्याचं काम प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी झालीच पाहिजे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करणं आमचं लक्ष्य आहे. या जबाबदारीपासून एक इंचदेखील मागे हटू नका. प्रियंका, सिंधिया यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक ध्येय समोर ठेवावं,' असं राहुल म्हणाले. काँग्रेस सर्व राज्यात, संपूर्ण देशात बॅकफूटवर नव्हे, तर फ्रंटफूटवर असेल, असंदेखील राहुल यांनी म्हटलं. आम्ही सर्व आव्हानांना निर्भिडपणे सामोरे जाऊ. कारण ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस आहे. प्रेम, बंधूभाव ही आमची विचारधारा आहे. देशाला जोडण्यासाठी आम्ही काम करतो. तर दुसऱ्या बाजूला भाजपा-आरएसएस आणि नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. देश तोडायचा, द्वेष निर्माण करायचा, देशाला कमकुवत करायचं हाच त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींनी पाच वर्षात काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशातला तरुण म्हणतोय, चौकीदार चोर है. चौकीदारानं एकालाही रोजगार दिला नाही. दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ, असं मोदी म्हणाले होते. मात्र त्यांनी राफेल डीलमधून अनिल अंबानींना लाभ मिळवून दिला. पंधरा उद्योगपतींचं साडे तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही, असं राहुल म्हणाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिल्या.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ