शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्य प्रदेशात काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील; दिग्विजय सिंहांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:43 IST

देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसला मध्य प्रदेशात चांगल्या जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील असंही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच प्री आणि पोस्ट सर्व्हेवर आपल्याला विश्वास नसून जनतेच्या मतांवर विश्वास आहे. २३ मे रोजी मतपेट्या उघडल्या की, चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितले. यावेळी दिग्विजय सिंह यांनी मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भाजपची भोपाळमधील उमेदवार प्रज्ञा ठाकूरविरुद्ध आपण विजयी होऊ असंही सांगितले.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, देशात मोदी लाट नसून त्सुनामी आहे. मोदी देशातील मना-मनात बसलेले आहेत. त्यांनी देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. त्यामुळे जनतेने त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे देखील चौहान म्हणाले. तसेच भाजपला देशात ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज देखील चौहान यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान