शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 8:41 PM

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

नवी दिल्ली-केंद्र सरकारनं आज वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे आज मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि मोदी सरकार बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळालं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता जनतेशी संवाद साधत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लढ्याला यश आल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे आज रद्द झाल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झाल्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देशभरात करणार असल्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. शनिवारी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीनं 'शेतकरी विजय दिवस' (Kisan Vijay Diwas) साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना २० नोव्हेंबरला शेतकरी विजय दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत ठिकठिकाणी रॅली आणि आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून कँडल मार्च आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रभारींना पत्र लिहिलं असून यात शेतकरी आंदोलन आणि त्यांचं बलिदान व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट होऊन केल्या गेल्या आंदोलनानंतर जाचक तीन कृषी कायदे रद्द केले गेले आहेत. आज सर्वांनी एकजुटीनं वाईटावर मात केली आहे आणि हे यश देशाच्या पोशिंद्याला समर्पित आहे, असं म्हटलं आहे. 

मोदींनी आज जनतेसमोर येत मागे घेतले कृषी कायदेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेस