शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

"काँग्रेसला निवडून आलेला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, निषेधासाठी केवळ ट्विट करणे पुरेसे नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:40 IST

ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत...

काँग्रेसमध्ये मध्यंतरी वादळ निर्माण झाले. ते शांत झाले आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी संघटनेत अनेक बदल केले. त्यात काही ज्येष्ठांची जागा नव्या नेत्यांनी घेतली. या बदलांच्या आधी ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत...महाराष्ट्रातील परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता?तीन पक्षांच्या युतीचे सरकार चालवणे खूपच कठीण असते. किमान समान कार्यक्रमात म्हटले की, पक्षांची समन्वय समिती असली पाहिजे; परंतु जे सरकारमध्ये बसले आहेत त्यांना ती नको आहे.

आघाडी सरकारने सुशांतसिंहराजपूत, कंगनाच्या विषयाचा विचका केला?यात एकट्या महाराष्ट्राचा हात नाही. दिल्लीचे कारस्थान नाही; पण त्यांचा हात आहे. केंद्राला कोविड, भारत-चीन, बेराजेगारी यावर लक्ष केंद्रित करायचे नाही.

तुमचा पक्ष मूक प्रेक्षक दिसतोय, तर शरद पवार बॅक सीट ड्रायव्हिंग करताहेत?हा प्रश्न त्यांना विचारणे चांगले.

महाराष्ट्रातील निष्क्रियता हीपक्षश्रेष्ठींच्या मौनाशी संबंधित आहे?निष्क्रियता नाही. आम्ही मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहोत. ते नेहमी दिल्लीहून मिळते.परंतु पक्षश्रेष्ठी गप्प बसून आहेत?तसे नाही. आमचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दर आठवड्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतात. चर्चा झाल्या.

तुमचे गृहमंत्री म्हणाले, तीआत्महत्या आहे. तसे वक्तव्य व्हायला नको होते. तुम्हाला पक्षश्रेष्ठींकडूनमार्गदर्शन हवे?चुकीविरुद्ध आम्हाला काही करायचे असेल, तर पक्षश्रेष्ठींची परवानगी हवी असते.

तुम्ही सोनिया गांधींना पत्र लिहिले, पण कार्यवाही झाली नाही?कार्यवाही झाली. सहा महिन्यांत विषय मार्गी लागेल.

पत्र लिहिणारे चार जण पक्षाच्या कार्यकारी समितीत असून, काय घडले ते त्यांनी सांगितले पाहिजे.कारवाईचे आश्वासन दिले गेले. पत्रावर सह्या करणारे सगळे २३ जण पक्षाचे ४०-५० वर्षांपासून निष्ठावंत आहेत. आम्ही काही पक्ष सोडून गेलो व परत आलो नाहीत, असे घडलेले नाही.

तुम्ही सोनिया गांधींना नेतृत्व करण्यास भाग पाडले?सोनिया गांधींनी विनंती हंगामी काळासाठी मान्य केली. याच काळात आम्हाला निवडणुका हव्या होत्या. पण तसे झाले नाही.

राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असे तुम्हाला वाटते?हो. आम्ही एवढेच म्हणालो की, निवडून आलेली कार्यकारिणी समिती असावी. सध्या पक्षाला चेहरा नाही. काँग्रेसला पूर्णवेळ निवडलेला अध्यक्ष असावा, जो लोकांना भेटू शकेल व त्याने आघाडीवर येऊन नेतृत्व करावे.

राहुल गांधी रोज ट्विट करतात. कामकाज ट्विटरवर किती चालणार?मोदी सरकारचा निषेध करण्याचा तो मार्ग आहे; पण तेवढ्याने मदत होणार नाही. रस्त्यावर येऊन कृती हवी.

तुमचे पुढचे पाऊल कोणते?आम्ही सगळे (जी-२३) एकत्र बसून परिस्थितीचा आढावा घेऊ.

तुम्हाला अजूनही आशा आहे?उम्मीदपर दुनिया कायम है.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस