शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:51 IST

देशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली.

- प्रसाद कुलकर्णीदेशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली.मध्य प्रदेशात लोकसभेचे २९ लोकसभा मतदारसंघ आहेत. गेल्या लोकसभा निवडणकुीत मोदी लाटेत भाजपाने त्यापैकी तब्बल २७ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला २ जागाच मिळाल्या. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदी लाटही राज्यात राहिलेली नाही आणि मतदारही पर्यायाच्या शोधात आहेत. त्याचे द्योतक म्हणजे हल्लीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका. सुमारे पंधरा वर्षे येथे भाजपाची सत्ता होती. पण यंदा २३० पैकी ११४ जागांवर मुसंडी मारून काँग्रेसने पुनरागमन केले. भाजपानेही जोरदार लढत देत १०९ जागा मिळवल्या आणि अन्यांना ७ जागा मिळाल्या. राहुल गांधी यांच्या प्रचाराची छाप निवडणूक निकालांवर स्पष्ट दिसून आली.राज्यातील पराभवाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापुढे कायमच देशात भाजपाची सत्ता राहणार आहे नि देश सतत मोदींच्या भाषणांना भुलणार आहे, अशा दिवास्वप्नात राहणाऱ्या भाजपाची धुंदी या निकालांनी खाडकन उतरली. खडबडून जाग आलेला भाजपाही आता तयारीला लागला असून राज्याचे प्रभारी स्वतंत्रदेव सिंह व सहप्रभारी सतीश उपाध्याय यांनी भाजपाच्या खासदारांचा साडेचार वर्षांचा लेखाजोखा तयार केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांत जनतेचा कौल मिळूनही चांगले काम करण्याची संधी काही जणांनी सत्तेच्या उन्मादात दवडली. भाजपाचच्या २७ पैकी १० खासदारांची कामगिरी अतिशय वाईट असल्याचा अहवाल प्रभारींनी श्रेष्ठींना पाठविला आहे. हे उमेदवार पुन्हा उभे राहिले तर नक्कीच आपटणार; याचा अंदाज प्रभारींना स्पष्टपणे आला. त्यामुळे त्या १0 जणांचा पत्ता ‘कट’ होणे निश्चित मानले जात आहे. याचा फायदा विधानसभेत पराभूत झालेल्या भाजपच्या काही नेत्यांना होण्याची शक्यता आहे. अनेक नेते यामुळे मनात गाजरे खात आहेत. मध्यंतरी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विधानसभेत हरलेल्या सहा मंत्र्यांना आता लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने २९ जागांना आता १० प्रभागांत विभागले असून पद्धतशीरपणे प्रचार यंत्रणा राबविण्याची तयारी चालवली आहे.दुसरीकडे विधानसभेतील यशामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे. लोकसभेच्या २९ पैकी किमान २० ते २२ जागा जिंकण्याची उमेद काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळगून आहेत. धार, खरगोन, मंडला, शाहडोल, रतलाम- झाबूआ, बैतूल या जागांवर काँग्रेस विशेष जोर देत आहे. हा सर्व आदिवासी पट्टा आहे. या परिसरातील ४७ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. सध्या या भागात केवळ रतलाममध्येच काँग्रेसचा खासदार आहे.छिंदवाडा ही जागा काँग्रेसची परंपरागत जागा मानली जाते. गुनामध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे तगडे उमेदवार काँग़्रेसकडे आहेत. धार आणिमंडला लोकसभा मतदारसंघांतील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला विजय मिळाला. बैतूलमध्ये भाजपा व काँग्रेसचे समसमान बल आहे. यामुळे येथे चुरशीची लढत होऊ शकते. शाहडोलमध्येही हीच परिस्थिती आहे, कारण बैतूल व शाहडोल या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचे आठपैकी प्रत्येकी चार आमदार आहेत. बालाघाटमध्ये आठपैकी सहा आमदार काँग्रेसचे आहेत. विधानसभेतील हे यश पुन्हा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. खरगोन, ग्वाल्हेर व मुरैनामध्ये तर आठपैकी सात आमदार काँग्रेसचे आहेत. भिंडमध्ये काँग्रेसचे पाच आमदार आहेत.मलासुद्धा खासदार व्हायचंय!अद्याप नावांच्या प्राथमिक याद्यांवरच चर्चा होत आहे; पण हौशे, नवशे, गवशे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या मागे फिरून ‘लोणी लावणेही’ सुरू आहे. आपल्या मागे जनमत व कार्यकर्त्यांची फौज आहे, असे भासविण्याचा काही जणांचा आटापिटाही सुरू आहे; पण फारच कमी जागा अशा आहेत की, जेथे या प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. बाकी घोडामैदानाला काहीसा वेळ आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश