शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

नरेंद्र मोदींना PUBG वरही बंदी आणायची होती पण...; काँग्रेसने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 13:59 IST

भारत सरकारने सोमवारी आणखी 47 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली.

नवी दिल्ली:  चीनवरभारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने सोमवारी आणखी 47 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. याआधी भारताने चीनचे 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. या अ‍ॅप्सवर यूजर्सचा डेटा लीक करण्याचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपीनंतर भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत त्यांच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. तसेच आता सरकारची नजर 275 चिनी अ‍ॅप्सवर आहे. ज्यामध्ये PUBG ऑनलाईन व्हिडिओ गेम अ‍ॅपचा देखील समावेश आहे. 

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅप्सवर यूजर्सचा डेटा लीक करण्याचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र यावर काँग्रेसने आता निशाणा साधला आहे. खरंतर मोदी सरकारला पबजी या ऑनलाईन व्हिडिओ गेम अ‍ॅपवर बंदी आणायची होती, पण मग तरुण गेम खेळायचं थांबले तर बेरोजगारीबद्दल बोलतील अशी भीती मोदी सरकारला आहे, असा उपरोधिक टोला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी लगावला आहे. अभिषेक मनु सिंघवी ट्विट करत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पबजीवर खरोखरच बंदी घालायची इच्छा होती. पण त्यांना समजले की कल्पनारम्य आभासी जगापासून विचलित केले तर तरुण खऱ्याखुऱ्या जगाबद्दल बोलायला लागतील. देशातील तरुण जॉब्ससारख्या वास्तविक जगाच्या गोष्टी विचारतील. त्यामुळे समस्या मोदी सरकारपुढे समस्या निर्माण होतील, असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्स भारत सरकारने आधीच बॅन केले आहेत. आता सरकारची नजर 275 चिनी अ‍ॅप्सवर आहे. ज्यामध्ये PUBG चाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एका अधिकृत सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिनी अ‍ॅप्ससंदर्भात माहिती गोळा केली जात असून त्यासंदर्भात चौकशी सुरु आहे. तसेच यासर्व अ‍ॅप्सना फंडिंग कुठून मिळतं, यासंदर्भातही माहिती गोळा करण्यात येत आहे. यापैकी काही अ‍ॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचं समोर आलं आहे, तर काही अ‍ॅप्स डाटा शेअरिंगच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, लद्दाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर चीनविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील सुरु करण्यात आली होती. चीनचे 59 अ‍ॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अ‍ॅपचाही समावेश होता. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अ‍ॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPUBG Gameपबजी गेमcongressकाँग्रेसIndiaभारतchinaचीनtechnologyतंत्रज्ञानCentral Governmentकेंद्र सरकार