शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:34 IST

जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने ईव्हीएमबद्दलच रडगाणे बंद करून, आहे तो निकाल स्वीकारण्याचा सल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या सहकारी पक्षाला दिला. निवडणुकीत विजय झाला तर निकाल स्वीकारायचा आणि पराभव झाला तर यंत्राला दोष द्यायचा असे चालणार नसल्याचे नमूद करत ईव्हीएमबद्दलच्या तक्रारी थांबवण्याचे आवाहन एका वृत्तसंस्थेशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान याच ईव्हीएमद्वारे तुमचे शंभरहून अधिक सदस्य संसदेत जातात, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय झाला म्हणून जल्लोष साजरा करतात. मात्र, काही महिन्यांनंतर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले म्हणून आम्हाला ईव्हीएम पसंत नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. 

...तर लढूच नका!

जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले. हरयाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल काँग्रेसकडून शंका उपस्थित हाेत आहे. काँग्रेस नेत्यांनी तर मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरEVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेस