शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:34 IST

जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने ईव्हीएमबद्दलच रडगाणे बंद करून, आहे तो निकाल स्वीकारण्याचा सल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या सहकारी पक्षाला दिला. निवडणुकीत विजय झाला तर निकाल स्वीकारायचा आणि पराभव झाला तर यंत्राला दोष द्यायचा असे चालणार नसल्याचे नमूद करत ईव्हीएमबद्दलच्या तक्रारी थांबवण्याचे आवाहन एका वृत्तसंस्थेशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान याच ईव्हीएमद्वारे तुमचे शंभरहून अधिक सदस्य संसदेत जातात, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय झाला म्हणून जल्लोष साजरा करतात. मात्र, काही महिन्यांनंतर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले म्हणून आम्हाला ईव्हीएम पसंत नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. 

...तर लढूच नका!

जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले. हरयाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल काँग्रेसकडून शंका उपस्थित हाेत आहे. काँग्रेस नेत्यांनी तर मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरEVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेस