शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 15:58 IST

मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध केला होता. इतकचं नाही तर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा हवाला देत पाकिस्ताने संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे भारताच्या विरोधात राहुल गांधींचे भाषण वापरले जाते याची काँग्रेसला लाज वाटायला हवी अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे. 

मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे देशाच्या ऐक्याला बाधा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाने पुन्हा पंतप्रधान केलं. त्यामळे पहिल्याच अधिवेशनात त्यांनी कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणालाच हे जमलं नसतं असं कौतुक अमित शहांनी केलं. 

अमित शहांनी सांगितले की, कलम 370 हटविण्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाचा मार्ग खुला झाला आहे. दहशतवाद्यांवर दबाव ठेवण्याचं काम केलं जात आहे. काश्मीरला पूर्णपणे भारताच्या सोबत आणलं आहे. सर्व लोक या निर्णयाच्या पाठिशी आहेत मात्र काही जण याचा विरोध करतात. काँग्रेसने कलम 370 हटविण्याला विरोध केला. आजही राहुल गांधी भाषण देतात त्याचं कौतुक पाकिस्तानात केलं जातं. त्यांच्या भाषणाचा उल्लेख भारताच्या विरोधात केला जातो याबाबत काँग्रेसला लाज वाटायला हवी असं त्यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला होता. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.  त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला होता. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानRahul Gandhiराहुल गांधी