शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 15:58 IST

मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध केला होता. इतकचं नाही तर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा हवाला देत पाकिस्ताने संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे भारताच्या विरोधात राहुल गांधींचे भाषण वापरले जाते याची काँग्रेसला लाज वाटायला हवी अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे. 

मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे देशाच्या ऐक्याला बाधा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाने पुन्हा पंतप्रधान केलं. त्यामळे पहिल्याच अधिवेशनात त्यांनी कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणालाच हे जमलं नसतं असं कौतुक अमित शहांनी केलं. 

अमित शहांनी सांगितले की, कलम 370 हटविण्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाचा मार्ग खुला झाला आहे. दहशतवाद्यांवर दबाव ठेवण्याचं काम केलं जात आहे. काश्मीरला पूर्णपणे भारताच्या सोबत आणलं आहे. सर्व लोक या निर्णयाच्या पाठिशी आहेत मात्र काही जण याचा विरोध करतात. काँग्रेसने कलम 370 हटविण्याला विरोध केला. आजही राहुल गांधी भाषण देतात त्याचं कौतुक पाकिस्तानात केलं जातं. त्यांच्या भाषणाचा उल्लेख भारताच्या विरोधात केला जातो याबाबत काँग्रेसला लाज वाटायला हवी असं त्यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला होता. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.  त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला होता. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानRahul Gandhiराहुल गांधी