शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 14:09 IST

Congress P Chidambaram And AAP, TMC : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत. याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. "काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुका तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी सारख्या पक्षांसोबत युती करून लहान भाऊ म्हणून लढण्यासाठी सज्ज आहे."

"2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी त्यांचा पक्ष आवश्यक असल्यास तडजोड करण्यास तयार आहे. ही तडजोड फक्त काँग्रेसच करेल असं नाही, तर प्रत्येक पक्षाला करावी लागेल. हे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही लागू होते. हा लढा राज्या-राज्यात होणार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. पंजाबमध्ये ‘आप’च्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. भाजपा विरोधात राज्या-राज्यात लढल्यास त्यांचा पराभव करणे शक्य आहे" असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला.

"काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज"

"पाच राज्यांमध्ये निवडणुकीत झालेल्या पराभवाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणं योग्य नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. परंतु कमिटीने हे मान्य केले नाही. आता आमच्याकडे कोणता पर्याय आहे? काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे. पण ते ऑगस्ट महिन्यात शक्य होईल" असंही पी. चिदंबरम  यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा

चिदंबरम यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाच्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर टीका केली. "गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही हे सर्वांनाच माहित आहे," असं चिदंबरम म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील पराभवासाठी गांधी कुटुंबीयांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असंही म्हटलं. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी आणि दुसरा निवडणूक लढवणं ही दोन कामं करण्याचे प्रयत्न केले. ही दोन्ही कामं एकाच वेळी होऊ शकत नाही असा इशारा मी त्यांना आधीच दिला होता. पक्षाची पुनर्बांधणी आधी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये जाणं नंतरही होऊ शकतं. परंतु दुर्देवानं पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली," असं ते म्हणाले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमAAPआपtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा