शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 14:09 IST

Congress P Chidambaram And AAP, TMC : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत. याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. "काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुका तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी सारख्या पक्षांसोबत युती करून लहान भाऊ म्हणून लढण्यासाठी सज्ज आहे."

"2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी त्यांचा पक्ष आवश्यक असल्यास तडजोड करण्यास तयार आहे. ही तडजोड फक्त काँग्रेसच करेल असं नाही, तर प्रत्येक पक्षाला करावी लागेल. हे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही लागू होते. हा लढा राज्या-राज्यात होणार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. पंजाबमध्ये ‘आप’च्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. भाजपा विरोधात राज्या-राज्यात लढल्यास त्यांचा पराभव करणे शक्य आहे" असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला.

"काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज"

"पाच राज्यांमध्ये निवडणुकीत झालेल्या पराभवाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणं योग्य नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. परंतु कमिटीने हे मान्य केले नाही. आता आमच्याकडे कोणता पर्याय आहे? काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे. पण ते ऑगस्ट महिन्यात शक्य होईल" असंही पी. चिदंबरम  यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा

चिदंबरम यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाच्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर टीका केली. "गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही हे सर्वांनाच माहित आहे," असं चिदंबरम म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील पराभवासाठी गांधी कुटुंबीयांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असंही म्हटलं. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी आणि दुसरा निवडणूक लढवणं ही दोन कामं करण्याचे प्रयत्न केले. ही दोन्ही कामं एकाच वेळी होऊ शकत नाही असा इशारा मी त्यांना आधीच दिला होता. पक्षाची पुनर्बांधणी आधी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये जाणं नंतरही होऊ शकतं. परंतु दुर्देवानं पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली," असं ते म्हणाले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमAAPआपtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा