शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

"हिंसाचार, जिवितहानी होऊनही...!" एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 22:49 IST

...आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी इंफाळ राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकजे आपला राजीनामा सादर केला. तत्पूर्वी एन. बिरेन सिंह यांनी आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी -यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "साधारणपणे दोन वर्षांपर्यंत भाजपचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली. मणिपूरमध्ये हिंसाचार, जिवितहानी आणि भारताच्या विचारांचा नाश होऊनही पंतप्रधान मोदींनी त्यांना हटवले नाही. एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून स्पष्ट होते की, लोकांचा वाढता दबाव, सुप्रीम कोर्टाकडून चौकशी आणि काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाने त्यांना असे करायला भाग पाडले. मात्र, सर्वात महत्वाचे काम, राज्यात शांतता प्रस्थापित करणे आणि मणिपूरच्या लोकांचे घाव भरून काढणे आहे."

"पंतप्रधानांनी तातडीने मणिपूरचा दौरा करावा" -काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी तातडीने मणिपूरला भेट द्यायला हवी, लोकांचे म्हणणे ऐकायला हवे आणि तेथील परिस्थिती कशीपद्धतीने सामान्य होईल यासंदर्भात सरकारची योजना सांगायला हवी." तसेच, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, "उद्या, काँग्रेस पक्ष मणिपूर विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. मात्र, वातावरण ओळखून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला."

मणिपूरमध्ये 2 वर्षे हिंसाचार सुरू मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे अनेक हिंसक चकमकी झाल्या, परिणामी शेकडो लोकांनी प्राण गमावले आणि हजारो लोकांना घर सोडावे लागले. जमीन, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व याबाबत मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये दीर्घकाळापासून वाद आहे. दरम्यान, राज्यातील सरकार पक्षपाती असल्याचा आरोप एका समुदायाकडून केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात मोठ्या प्रमाणावर चकमकी झाल्या. केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात केले आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी