शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

"हिंसाचार, जिवितहानी होऊनही...!" एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 22:49 IST

...आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी इंफाळ राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकजे आपला राजीनामा सादर केला. तत्पूर्वी एन. बिरेन सिंह यांनी आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी -यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "साधारणपणे दोन वर्षांपर्यंत भाजपचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली. मणिपूरमध्ये हिंसाचार, जिवितहानी आणि भारताच्या विचारांचा नाश होऊनही पंतप्रधान मोदींनी त्यांना हटवले नाही. एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून स्पष्ट होते की, लोकांचा वाढता दबाव, सुप्रीम कोर्टाकडून चौकशी आणि काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाने त्यांना असे करायला भाग पाडले. मात्र, सर्वात महत्वाचे काम, राज्यात शांतता प्रस्थापित करणे आणि मणिपूरच्या लोकांचे घाव भरून काढणे आहे."

"पंतप्रधानांनी तातडीने मणिपूरचा दौरा करावा" -काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी तातडीने मणिपूरला भेट द्यायला हवी, लोकांचे म्हणणे ऐकायला हवे आणि तेथील परिस्थिती कशीपद्धतीने सामान्य होईल यासंदर्भात सरकारची योजना सांगायला हवी." तसेच, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, "उद्या, काँग्रेस पक्ष मणिपूर विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. मात्र, वातावरण ओळखून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला."

मणिपूरमध्ये 2 वर्षे हिंसाचार सुरू मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे अनेक हिंसक चकमकी झाल्या, परिणामी शेकडो लोकांनी प्राण गमावले आणि हजारो लोकांना घर सोडावे लागले. जमीन, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व याबाबत मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये दीर्घकाळापासून वाद आहे. दरम्यान, राज्यातील सरकार पक्षपाती असल्याचा आरोप एका समुदायाकडून केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात मोठ्या प्रमाणावर चकमकी झाल्या. केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात केले आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी