शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:21 IST

Congress Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी भाजपाच्या 'डबल इंजिन' सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपा आणि काँग्रेसमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच संघर्ष पाहायला मिळतो. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. याच दरम्यान राहुल गांधी यांनी भाजपाच्या 'डबल इंजिन' सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "देशभरातील 'भ्रष्ट' जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. 

"भ्रष्टाचारासोबतच सत्तेचा दुरुपयोग आणि अहंकाराचे विष भाजपाच्या राजकारणात वरपासून खालपर्यंत पसरलं आहे. त्यांच्या व्यवस्थेत गरीब, असहाय, मजूर आणि मध्यमवर्गीयांचे आयुष्य हे केवळ एक 'आकडा' बनलं आहे. 'विकासाच्या' नावाखाली केवळ वसुलीचे तंत्र सुरू आहे" असं ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले, "अंकिता भंडारीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला, पण प्रश्न आजही तोच आहे - सत्तेचे संरक्षण कोणत्या 'व्हीआयपी'ला वाचवत आहे? कायदा सर्वांसाठी समान कधी होणार?" तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरणाची आठवण करून देत त्यांनी म्हटलं की, "सत्तेच्या गर्वात गुन्हेगारांना कसं वाचवलं गेलं आणि पीडितेला न्यायासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे."

इंदूरमधील दूषित पाण्याच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी सरकारला घेरलं. "इंदूरमध्ये विषारी पाणी प्यायल्यामुळे होणारे मृत्यू असोत किंवा गुजरात, हरियाणा आणि दिल्लीतील दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असोत; सर्वत्र आजारांची भीती पसरली आहे. राजस्थानची अरावली पर्वतश्रेणी असो किंवा नैसर्गिक संसाधने - जिथे जिथे अब्जाधीशांचा लोभ आणि स्वार्थ पोहोचला, तिथे नियमांची पायमल्ली झाली. डोंगर कापले जात आहेत, जंगलं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि बदल्यात जनतेला केवळ धूळ, प्रदूषण आणि आपत्ती मिळत आहे" अशी टीका त्यांनी केली.

आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवर बोट ठेवत राहुल गांधी पुढे म्हणाले, "खोकल्याच्या सिरपमुळे मुलांचा होणारा मृत्यू, सरकारी रुग्णालयांत नवजात बालकांना कुरतडणारे उंदीर किंवा सरकारी शाळांची कोसळणारी छते - हा निव्वळ 'बेजबाबदारपणा' नसून भ्रष्टाचाराचा थेट फटका आहे. पूल कोसळतात, रस्ते खचतात, रेल्वे अपघातात संपूर्ण कुटुंबे संपतात, पण भाजप सरकार दरवेळी तेच करते - फोटो, ट्विट आणि मदतीची औपचारिकता." शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटलं की, "मोदीजींचं 'डबल इंजिन' फक्त अब्जाधीशांसाठी धावत आहे. सामान्य भारतीयासाठी हे भ्रष्टाचारी डबल इंजिन सरकार म्हणजे विकास नसून विनाशाचा वेग आहे, जो दररोज कोणा ना कोणाचे आयुष्य चिरडत आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi slams BJP's 'double engine' government for corruption.

Web Summary : Rahul Gandhi accuses BJP's 'double engine' governments of corruption, ruining lives. He cites issues like contaminated water, infrastructure failures, and the Ankita Bhandari case, alleging the system favors the wealthy while crushing the poor and middle class.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण