शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Rahul Gandhi : "रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:12 IST

Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये 69 हजार सहाय्यक शिक्षकांच्या भरतीचे प्रकरण जोर धरत आहे. अनियमिततेचा आरोप करत उमेदवार सातत्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान, लखनऊमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर राजकीय वर्तुळात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच या लाठीचार्जचा निषेध केला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील ट्वीट करत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "रोजगार मागणाऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारने लाठ्या दिल्या. भाजपा जेव्हा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" असं म्हटलं आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी आंदोलक तरुणांवर केलेल्या लाठीचार्जचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. प्रियंका गांधी यांनी "उत्तर प्रदेशचे तरुण हातात मेणबत्तीचा प्रकाश घेऊन रोजगार द्या ही मागणी करत होते. मात्र योगी सरकारने त्या तरुणांवर लाठीचार्ज केला. तरुणांनो यांनी कितीही लाठीचार्ज करू द्या, रोजगाराच्या हक्काची लढाई थांबू देऊ नका. या लढाईत मी तुमच्यासोबत आहे" असं म्हटलं आहे. 

"ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक मिळाली असती का?"

प्रियंका गांधी यांनी याआधी उत्तर प्रदेशमधील सहशिक्षक भरती घोटाळ्यावर हल्लाबोल केला होता. "उत्तर प्रदेश टीईटी परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाईंड भाजपा आमदाराचा भाऊ आहे. योगी आदित्यनाथ यांची सक्ती आणि पारदर्शकतेच्या गप्पा पोकळ आहेत" असं म्हटलं आहे. भाजपा खासदार वरुण गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. वरुण गांधी लाठीचार्जचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले की, 'ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक दिली असती का? ही मुले भारतमातेचे लाल आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे तर दूरच, कोणीही त्यांच म्हणणं ऐकायला तयार नाही. त्यातच त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला गेला. मनावर हात ठेवून विचार करा की ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक मिळाली असती का?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काही दिवसांपूर्वीच UPTET भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये यूपी पोलिसांनी 26 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही यूपी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधकही या प्रकरणावरुन भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ