शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

“BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:02 IST

Congress MP Rahul Gandhi News: BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली.

Congress MP Rahul Gandhi News: भारताला मिळालेले स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण त्यानंतर पहिल्यांदाच देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांना संविधानाद्वारे अधिकार मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तसेच संविधानाची निर्मिती होण्यापूर्वी या देशात गरिबांना कोणतेच अधिकार देण्यात आलेले नव्हते. ही गोष्ट लक्षात ठेवा, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

एका सभेत बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना कोणतेही अधिकार नव्हते. केवळ राजे-महाराजे यांनाच अधिकार होते. मात्र, जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी यात बदल झाला. तुम्हाला जमिनी देण्यात आल्या, जमिनीचे हक्क देण्यात आले, अधिकार देण्यात आले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

हीच लढाई सुरू आहे, तुम्ही मुद्दा लक्षात घ्या

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांना स्वातंत्र्यापूर्वी जशी परिस्थिती होती, तशी त्यांना पुन्हा आणायची आहे. पारतंत्र्यात जसे कोणालाही अधिकार नव्हते, फक्त अदानी आणि अंबानी यांसारख्या लोकांना अधिकार होते. पुन्हा तसाच भारत व्हावा, असेच त्यांना कायम वाटते. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, ते खरे स्वातंत्र्य नव्हते. कारण BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत. भाजपा आणि संघाला बहुजन आणि गरिबांचे हक्क आणि अधिकार काढून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम करायचे आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला. हीच लढाई सुरू आहे. तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला गुलाम बनवले जात आहे. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, गरिबांना पुन्हा गुलाम बनवले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

दरम्यान, भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एका बाजूला संविधानावर विश्वास ठेवणारी आणि त्यासाठी लढणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस-भाजप आहे, जी संविधानाच्या विरोधात आहेत, ती विचारधारा संविधान कमकुवत करू इच्छिते. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, त्यात भारताची हजारो वर्षे जुनी विचारसरणी आहे. त्यात आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचा आवाज आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यघटना रद्द करण्याची भाषा वापरली होती. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलू, असे ते म्हणाले होते. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते समोर उभे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानापुढे झुकावे लागले, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा