शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

“BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:02 IST

Congress MP Rahul Gandhi News: BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली.

Congress MP Rahul Gandhi News: भारताला मिळालेले स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण त्यानंतर पहिल्यांदाच देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांना संविधानाद्वारे अधिकार मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तसेच संविधानाची निर्मिती होण्यापूर्वी या देशात गरिबांना कोणतेच अधिकार देण्यात आलेले नव्हते. ही गोष्ट लक्षात ठेवा, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

एका सभेत बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना कोणतेही अधिकार नव्हते. केवळ राजे-महाराजे यांनाच अधिकार होते. मात्र, जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी यात बदल झाला. तुम्हाला जमिनी देण्यात आल्या, जमिनीचे हक्क देण्यात आले, अधिकार देण्यात आले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

हीच लढाई सुरू आहे, तुम्ही मुद्दा लक्षात घ्या

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांना स्वातंत्र्यापूर्वी जशी परिस्थिती होती, तशी त्यांना पुन्हा आणायची आहे. पारतंत्र्यात जसे कोणालाही अधिकार नव्हते, फक्त अदानी आणि अंबानी यांसारख्या लोकांना अधिकार होते. पुन्हा तसाच भारत व्हावा, असेच त्यांना कायम वाटते. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, ते खरे स्वातंत्र्य नव्हते. कारण BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत. भाजपा आणि संघाला बहुजन आणि गरिबांचे हक्क आणि अधिकार काढून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम करायचे आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला. हीच लढाई सुरू आहे. तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला गुलाम बनवले जात आहे. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, गरिबांना पुन्हा गुलाम बनवले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

दरम्यान, भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एका बाजूला संविधानावर विश्वास ठेवणारी आणि त्यासाठी लढणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस-भाजप आहे, जी संविधानाच्या विरोधात आहेत, ती विचारधारा संविधान कमकुवत करू इच्छिते. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, त्यात भारताची हजारो वर्षे जुनी विचारसरणी आहे. त्यात आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचा आवाज आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यघटना रद्द करण्याची भाषा वापरली होती. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलू, असे ते म्हणाले होते. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते समोर उभे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानापुढे झुकावे लागले, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा